AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याची खरी अग्निपरीक्षा, या दोन बलाढ्य संघाशी होणार सामना

मुंबई इंडियन्सची सुरुवात खुपच खराब झाली आहे. असं असलं तरी तीन सामन्यानंतर मुंबईला विजयाची चव चाखता आली आहे. पण आता पुढचे दोन सामने मुंबईसाठी आव्हानात्मक आहेत. कारण त्यांना आरसीबी आणि सीएसकेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याची खरी कसोटी लागणार आहे.

हार्दिक पांड्याची खरी अग्निपरीक्षा, या दोन बलाढ्य संघाशी होणार सामना
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 10, 2024 | 4:31 PM
Share

Mumbai Indians IPL: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला सलग तीन वेळा पराभवाचा सामना  करावा लागला आहे. चौथ्या सामन्यात त्यांनी आपला पहिला विजय नोंदवला आहे. संघाने खाते उघडले असले तरी ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. त्यामुळे अजून तरी प्ले ऑफसाठी सर्व संघाना संधी आहे. पण मुंबईला पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे खरी कसोटी ही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची असेल. कारण त्याला आता दोन मोठ्या संघांचा सामना करावा लागणार आहे.

पहिल्या तीन सामन्यात पराभव

यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून 6 धावांनी पराभव झाला होता. यानंतर सनरायझर्स हैदराबादकडून मुंबईचा 31 धावांनी पराभव झाला. इतकंच नाही तर घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने मुंबई संघाचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे हार्दिक पांड्याला चाहते ट्रोल करु लागले होते. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे पहिला विजय मिळवला आहे.

सलग तीन पराभवा झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यावर हल्लाबोल झाला होता. मात्र चौथ्या सामन्यात त्याला पहिल्या विजय मिळाल्याने जरा दिलासा मिळालाय. घरच्या मैदानावर मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला. आता विश्रांतीनंतर मुंबईचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आता त्यांचा सामना आरसीबी आणि सीएसकेशी होणार आहे. जो आयपीएलचा सर्वात मोठा सामना मानला जातोय.

RCB आणि CSK ला भिडणार

11 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी मुंबई संघ आरसीबीशी भिडणार आहे तर 14 एप्रिलला मुंबईचा सामना सीएसकेशी होणार आहे. आरसीबी आणि सीएसकेनेही आपले काही सामने गमावले आहेत, त्यामुळे ते ही विजयासाठी चांगली कामगिरीवर भर देतील. अशा स्थितीत हे दोन्ही सामने जिंकण्यासाठी मुंबईला मोठी कसरत करावी लागणार आहे.

मुंबईचे हे दोन्ही सामने घरच्या म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी प्लस पॉईंट असेल. मुंबईला आता आरसीबी आणि सीएसके विरुद्ध चांगली कामगिरी करुन सामने जिंकावे लागतील. यामध्ये खरी परीक्षा ही कर्णधार हार्दिक पांड्याची असणार आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ