AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus : WTC Final मधील पराभवाला IPL कसं जबाबदार? सगळेच एक साधी, सोपी गोष्ट विसरतायत

Ind vs Aus WTC Final : पराभवानंतर कारणं शोधण्याची सवय कधी सुटणार? साध्या-सोप्या गोष्टी कोणी लक्षात घेत नाहीय. टीम इंडियाचा एक प्लेयर काही महिने इंग्लंडमध्येच होता. पण काय फायदा झाला?

Ind vs Aus : WTC Final मधील पराभवाला IPL कसं जबाबदार? सगळेच एक साधी, सोपी गोष्ट विसरतायत
ind vs aus wtc final 2023 Image Credit source: PTI
| Updated on: Jun 12, 2023 | 3:40 PM
Share

लंडन : टीम इंडियाचा एखाद्या मोठ्या स्पर्धेत किंवा महत्वाच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर लगेच कारणांचा शोध घ्यायला सुरुवात होते. खोलात जाऊन विचार करण्यापेक्षा डोळ्यासमोर जे कारण असतं, ते पहिलं सांगितलं जातं. काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया WTC फायनलमध्ये हरली. आधी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. WTC फायनलच्या काही महिने आधी मायदेशात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवलं होतं.

त्याआधी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलेलं. त्यांच्या घरात जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच पारड जड मानलं जातं होतं.

काय केलं, तर फक्त टॉस जिंकला

प्रत्यक्षात फायनल सामना सुरु झाल्यानंतर टॉस आणि पहिल्या दिवसाच पहिलं सत्र वगळता टीम इंडिया संपूर्ण मॅचमध्ये बॅकफूटवर होती. टीम इंडियाला एकही दिवस कसोटीवर वर्चस्व निर्माण करता आलं नाही. परिणामी टीम इंडियाचा 209 धावांनी दारुण पराभव झाला. आता या पराभवाच विश्लेषण करताना वेगवेगळी कारण शोधली जात आहेत.

फक्त IPL कशी जबाबदार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवासाठी IPL 2023 ला जबाबदार धरलं जातय. आयपीएलमुळे टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये पराभव झाला, असं अनेक क्रिकेट विश्लेषकांच मत आहे. WTC मधील पराभवाला फक्त एकमेव IPL टुर्नामेंट कशी जबाबदार असू शकते?. टीम इंडियाचे खेळाडू फक्त दोन महिने आयपीएलमध्ये खेळतात. त्याआधी वर्षभर त्यांच वनडे, T20 आणि टेस्ट क्रिकेट सुरुच असतं.

वर्षभरात फक्त IPL मध्येच खेळलेत का?

टीम इंडियाचे खेळाडू वर्षभरात फक्त IPL खेळून, डायरेक्ट WTC ची फायनल खेळत नाहीयत ना? त्याआधी ते बरच T20, वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळलेत. महत्वाच म्हणजे या टीममध्ये कोणी नवखे खेळाडू नाहीयत. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे आणि टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दीर्घ अनुभव मग आयपीएल कसं जबाबदार?

फिटनेसचा मुद्दा अयोग्य

फिटनेसचा विषय असेल, तर सगळे खेळाडू फिट होते, म्हणून त्यांची निवड केली होती. जसप्रीत बुमराह, केएल राहुल अनफिट असल्यामुळे त्यांची निवड झाली नव्हती. त्यामुळे फायनल हरण्याला फिटनेसचा मुद्दा सुद्धा लागू पडत नाही.

जेव्हा गरज होती, तेव्हा तो ढेपाळला

चेतेश्वर पुजारा तर आधीपासून इंग्लंडमध्ये होता. WTC फायनलच्या काही महिने आधीपासून चेतेश्वर पुजारा तिथे काऊंटी क्रिकेट खेळतोय. महत्वाच म्हणजे त्याने तिथे अनेक शतकं सुद्धा झळकवली आहेत. चेतेश्वर पुजाराच्या त्याच फॉर्मचे दाखले दिले जात होते. पण इंग्लंडमध्ये इतके महिने राहून चेतेश्वर पुजाराने काय केलं? जेव्हा गरज होती, तेव्हा तो ढेपाळला. मग पराभवाला फक्त आयपीएल कसं जबाबदार

WTC फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 आणि दुसऱ्या डावात 27 रन्सवर बाद झाला. तो, तर आयपीएल खेळत नव्हता. इंग्लंडमध्ये इतके महिने राहून, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतरही तो फ्लॉप होतो. मग पराभवाला आयपीएल कसं जबाबदार?

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती