AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसीकडून बेस्ट टी 20 टीम ऑफ द ईयरची घोषणा, भारताच्या या 3 खेळाडूंची निवड

आयसीसीने बेस्ट टी 20 टीम ऑफ 2022 ची घोषणा केली आहे. यामध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. तर टीम इंडियाच्या एकूण 3 स्टार खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

आयसीसीकडून बेस्ट टी 20 टीम ऑफ द ईयरची घोषणा, भारताच्या या 3 खेळाडूंची निवड
| Updated on: Jan 23, 2023 | 4:47 PM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने 2022 या वर्षातील टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. आयसीसीने 2022 या वर्षातील खेळाडूंची कामगिरी पाहता एकूण 11 जणांची निवड केली आहे. या 11 खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या जॉस बटलरला या बेस्ट टी 20 टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

टीम इंडियाच्या 3 खेळाडूंची निवड

आयसीसीने निवडलेल्या बेस्ट टी 20 प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘रनमशीन’ विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऑलराउंडर हार्दिक पांड्या या त्रिमूत्रींचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंसाठी 2022 हे वर्ष अविस्मरणीय राहिलं. विराटने या वर्षात एशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या. तसेच सूर्यकुमार 2022 या वर्षातील सर्वोत्तम टी 20 फलंदाज ठरला.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमारसाठी 2022 वर्ष कधीही न विसरता येणार आहे. सूर्यकुमार एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. सूर्याने 1 हजार 164 धावा केल्या. यामध्ये 2 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 189.68 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या. तसेच सूर्याने 2022 या वर्षाचा शेवट टी 20 क्रिकेटमधील एक नंबर फलंदाज म्हणून केला.

हार्दिक पांड्या

स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. पांड्याने 2022 मध्ये 607 धावा केल्या. तसेच 20 विकेट्सही घेतल्या.

आयसीसी टी 20 सर्वोत्तम टीम

जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद रिजवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सैम कुर्रन, वानिंदु हसरंगा, हारिस रऊफ आणि जोश लिटिल.

दरम्यान टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना हा मंगळवारी 24 जानेवारीला इंदूरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर तिसरा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न हा न्यूझीलंडचा असेल. टीम इंडियाने ही मालिका जिंकल्याने तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.