T20 WC 2026: पाकिस्तानने अमेरिकेला पराभूत करताच भारताला फटका, दुसऱ्या सामन्यापूर्वी…

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेला 32 धावांनी पराभूत केलं. यासह पाकिस्तानने भारताला गुणतालिकेत मागे टाकलं आहे. त्यामुळे नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

T20 WC 2026: पाकिस्तानने अमेरिकेला पराभूत करताच भारताला फटका, दुसऱ्या सामन्यापूर्वी...
पाकिस्तानने अमेरिकेला पराभूत करताच भारताला फटका, दुसऱ्या सामन्यापूर्वी...
Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 10, 2026 | 10:48 PM

T20 World Cup 2026 Points Table: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील प्रत्येक सामना आता गुणतालिकेवर प्रभाव टाकणारा आहे. त्यामुळे जय पराजयामुळे गुणतालिकेत उलथापालथ होणार हे निश्चित आहे. साखळी फेरीचे सामने तिसऱ्या टप्प्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या गटातील गुणतालिकेत अव्वल दोन स्थानावर राहण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड आणि नामिबिया एकाच गटात आहेत. त्यामुळे या गटातून टॉपला असलेले दोन संघ सुपर 8 फेरीत जागा मिळवणार आहेत. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेला 32 धावांनी पराभूत केलं. यासह गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. असं असलं तरी नेट रनरेटच्या बाबतीत टीम इंडिया अजूनही पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे.

गुणतालिकेत कशी आहे स्थिती?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात नेदरलँडला आणि दुसऱ्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे 4 गुण आणि +0.932 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ एकच सामना खेळला असून अमेरिकेला पराभूत केलं आहे. भारताचे 2 गुण आणि नेट रनरेट हा +1.450 इतका आहे. नेदरलँडने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 2 गुणासह नेदरलँडचा संघ +0.356 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. नामिबिया आणि अमेरिका यांचं अजूनही खात खोललेलं नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

भारताचा पुढचा सामना नामिबियाशी आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारताने हा सामना जास्त धावांनी किंवा जास्त चेंडू राखून जिंकला तर नेट रनरेट आणखी चांगला होईल. त्यामुळे पाकिस्तानच्या पुढे निघून जाईल. पण 15 फेब्रुवारीला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजय संघ या गटात टॉपला राहील हे निश्चित आहे. त्यामुळे आता गुणतालिकेत किती आदळआपट झाली तर भारत पाकिस्तान सामना गुणतालिकेतील स्थान ठरवणार आहे.