AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो 'Unlucky', 'हे' आहे त्यामागील कारण
इंग्लंड कसोटी संघ
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 11:48 AM
Share

लंडन : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. कर्णधार जो रूट (Joe Root) आणि कंपनीसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी (22 ऑगस्ट) त्यांना सामना खेळावा लागणार नाही. कारण आजचा दिवस इंग्लंड क्रिकेटसाठी अत्यंत अशुभ आहे. याचे कारणही तसेच आहे. इतिहासात याच दिवशी वेगवेगळ्या वर्षात दोन वेळा इंग्लंड संघाला महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात महत्त्वाची भूमिका गोलंदाज पार पाडत आहेत. असंच काहीसं तेव्हाही झालं होतं जेव्हा क्रिकेट इतिहासातील दोन महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडचा संघ पराभूत झाला होता. दोन्ही वेळा 22 ऑगस्टचाच दिवस होता, अन् वर्ष होतं 1930 आणि 1934. प्रसिद्ध अशा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एशेज सीरीजची ही गोष्ट सुरु असून दोन्ही वर्षी इंग्लंडला एकाच दिवशी पराभव पत्करावा लागला होता.

1930 मधील इंग्लंडचा पराभव

सगळ्यात आधी 1930 मध्ये एशेज सीरीजचा शेवटचा म्हणजेच पाचवा कसोटी सामना सुरु होता. ओवलच्या मैदानावर 16 ऑगस्ट रोजी सुरु झालेला हा सामना पाच नाही तर तब्बल सात दिवस चालला.  22 ऑगस्टला सामन्याचा निर्णय समोर आला. कारण 17 ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस होता तर 21 ऑगस्टरोजीही खेळ झाला नव्हता.  सामन्या इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 251 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पर्सी हॉर्नीब्रुकने उत्तम गोलंदाजी करत 31.2 ओव्हरमध्ये 92 धावा देत 7 फलंदाजाना बाद केलं. ज्यामुळेच सामन्यात ऑस्ट्रेलियाने 39 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने  5 सामन्यांची मालिकाही 2-1 ने खिशात घातली.

1934 मध्येही 22 ऑगस्टलाच इंग्लंड पराभूत

1930 मधील पराभवानंतर 1934 मध्येही इंग्लंडसोबत असच काहीसं झालं. एशेज मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना ओवलच्याच मैदानावर 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत खेळवण्यात आला होता. या सामन्यातही 19 ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर तब्बल 708 धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यानंतर 22 ऑगस्ट रोजी इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 145 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू क्लॅरी ग्रिमिटने उत्कृष्ट भूमिका पार पाडली. त्याने 26.3 ओव्हरमध्ये 64 धावा देत 5 विकेट घेतले. ज्यामुळे इंग्लंडला 22 ऑगस्टच्या दिवशी 1934 मध्ये तब्बल 562 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सोबतच इंग्लंडला 5 सामन्यांची मालिकाही 2-1 ने गमवावी लागील. अशाप्रकारे 1930 आणि 1934 मध्ये दोन्ही दिवशी 22 ऑगस्ट रोजी इंग्लंडला महत्त्वाचे सामने ज्यामुळे संपूर्ण मालिका गमवावी लागली होती.

हे ही वाचा

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत अँडरसन बुमराहला नेमकं काय म्हणाला होता? ज्यानंतर बुमराह चवताळला, आश्विनने केला खुलासा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(In History of england cricket on this day 22nd august they lost ashes series in 1930 and 1934)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा