
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. रविवार 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याविषयी क्रिकेट जगतात चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने या ऐतिहासिक सामन्यावर आपले मत व्यक्त केले आहे. डिव्हिलियर्सने भारत हा ऐतिहासिक सामना जिंकण्यासाठी फेव्हरेट असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एबी डिव्हिलियर्सने म्हटले की, ‘सध्याच्या फॉर्म आणि घरची परिस्थिती पाहता, टीम इंडियाकडे विश्वविजेते बनण्याची सुवर्णसंधी आहे. न्यूझीलंडबद्दल बोलताना तो म्हणाला की, टभारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध जिंकण्याची शक्यता खूपच कमी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, न्यूझीलंडकडे जिंकण्याची शक्यता फक्त 10 ते 20 टक्के आहे. भारताला हरवण्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागेल.’ पुढे बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, ‘जर भारताने हा सामना गमावला तर तो एक मोठा उलटफेर असेल. डेल स्टेननेही म्हटले की, टमला न्यूझीलंडबद्दल सहानुभूती आहे, मात्र माझे मन भारताला विजेता म्हणून पाहते.’
एबी डिव्हिलियर्सने जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणून उल्लेख केला. त्याने बुमराहच्या गोलंदाजीची आणि दबाव सहन करण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. तो म्हणाला की, ‘बुमराहला सामन्याच्या प्रत्येक क्षणाची चांगली समज आहे. त्याला माहित आहे की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संघाला काय आवश्यक आहे आणि तो त्याचे कौशल्य पूर्णपणे अचूकतेने वापरतो. बुमराहचा आत्मविश्वास आणि यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता ही भारतासाठी जमेची बाब आहे.’
एबी डिव्हिलियर्सने पुढे बोलताना म्हटले की, ‘मी टीम इंडियाच्या मागे पूर्णपणे आहे. माझे मन आणि हृदय, सर्वकाही भारताच्या विजयाकडे लक्ष वेधत आहे.’ मात्र त्यांनी न्यूझीलंडचे वर्णन एक धोरणात्मकदृष्ट्या हुशार संघ म्हणून केले. तो म्हणाला की, ‘न्यूझीलंड हा परिस्थितीनुसार आपल्या योजना जुळवून घेण्यात पारंगत आहे. मात्र अंतिम सामन्यात भारताची ताकद इतकी मोठी आहे की न्यूझीलंडला जिंकण्यासाठी चमत्कार करावा लागेल.’