AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : फायनलपूर्वी कपिल देव यांचा अभिषेक शर्माला खास सल्ला, टीम इंडियालाही दिला गुरूमंत्र

IND vs NZ : अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी कर्णधार कपिल देव यांनी अभिषेक शर्मा आणि टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे.

T20 World Cup : फायनलपूर्वी कपिल देव यांचा अभिषेक शर्माला खास सल्ला, टीम इंडियालाही दिला गुरूमंत्र
Kapil Dev And Abhi SharmaImage Credit source: Google
| Updated on: Mar 06, 2026 | 8:07 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माने लौकिकेला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातून बाहेर बसवण्याची मागणी केली जात आहे. अशातच यावर आता माजी कर्णधार कपिल देव यांनी अभिषेक शर्मा आणि टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अभिषेक शर्माला संघातून वगळू नये

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले की, ‘भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये खराब फॉर्म असला तरी अभिषेक शर्माचा समावेश करावा. अभिषेकला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की, तो खेळू शकतो आणि तो खेळेल.’ टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला सल्ला देताना त्यांनी म्हटले की, ‘तुमच्या संघावर विश्वास ठेवा आणि व्यवस्थापनाला खेळाडूवर विश्वास ठेवावा लागेल.’

इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनल मध्ये भारताने 250 पेक्षा जास्त धावा करूनही केवळ 7 धावांनी विजय मिळवला होता. यावर बोलताना कपिल देव म्हणाले की, सामना इतका क्लोज होईल अशी अपेक्षा नव्हती. भारताने 250 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर मला वाटले होते की कोणतीही अडचण येणार नाही. हा एक उत्तम सामना होता. विजयाबद्दल भारताचे अभिनंदन, पण शेवटी क्रिकेट जिंकले. मी हा सामना खूप एन्जॉय केला.’

बुमराह हा जगातील नंबर वन गोलंदाज – कपिल देव

पुढे बोलताना, कपिल देव म्हणाले की, “बुमराह हा जगातील नंबर वन गोलंदाज आहे. तो सर्वोत्तम आहे कारण तो दबावाखाली चांगली कामगिरी करतो.” सलामीवीर संजू सॅमसनचे कौतुक करताना कपिल देव म्हणाले की, “तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. कधीकधी मोठ्या खेळाडूंना वाईट काळाचा सामना करावा लागतो, जसे अभिषेक आता सामना करत आहे, परंतु जर ते मोठे खेळाडू असतील तर ते कमबॅक करतील. संजूने गेल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.