IND vs AUS T20 : भारतानं टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाची पहिले फलंदाजी

| Updated on: Sep 23, 2022 | 9:45 PM

IND vs AUS T20 : नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) दुसरा टी-20 सामना सुरु झालाय. पण, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. दरम्यान, टॉस भारतानं जिंकला असून पहिले गोलंदाजी निवडली आहे.

IND vs AUS T20 : भारतानं टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाची पहिले फलंदाजी
भारतानं टॉस जिंकला
Image Credit source: icc
Follow us on

नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) टीम इंडिया नागपुरात (Nagpur) आमनेसामने आले असून भारतानं टॉस जिंकत पहिले गोलंदाजी निवडली आहे. दुसरा टी-20 (t20) सामना नागपुरात खेळवला जातोय. एकीकडे या सामन्यावर पावसाचं सावट असून नाणेफेकला यामुळे उशिर झाला होता. टीम इंडियानं जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. 208 धावा करूनही टीम इंडियाच्या हाती मागच्या सामन्यात पराभव आला. पण, आता विजयी होण्याचा उद्देश घेऊन टीम इंडियात मैदानात उतरली आहे.

बीसीसीआयचं ट्विट

आठ षटकांचा सामना

आजचा सामना प्रत्येक डावात आठ षटकांचा असणार आहे.  गोलंदाजाला दोन षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी करता येणार नाही. तर दुसरीकडे  पॉवरप्ले दोन षटकांचा असेल.

भारताचे प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (क), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अ‍ॅडम झाम्पा, शॉन अ‍ॅबॉट