Monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो धो धो धो पाऊस, 15 जून नाहीच, मॉन्सूनचे मोठे अपडेट
Monsoon Update : राज्यात मॉन्सून 15 जूनला दाखल होणार होता. मात्र, यादरम्यानच आता मॉन्सूनबद्दल मोठी अपडेट आहे. मॉन्सून अरबी समुद्रात रेंगाळला आहे. आता मॉन्सूनची नवीन तारीख पुढे आली आहे. अजून काही दिवस मॉन्सूनच्या पावसासाठी वाट बघावी लागणार आहे.

राज्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. राज्यात पाऊस लांबणीवर पडताना दिसत आहे. 11 जूनपर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होतो. मात्र, यंदा 11 जून उलटूनही पावसाचा पत्ता नाही. 15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल पुढे होत नाही. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने मॉन्सूनवर सावट आहे. यादरम्यानच आता मॉन्सूनची नवीन तारीख जाहीर करण्यात आली. मुंबईसह राज्यभरात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चिंता अधिक वाढली. अफगाणिस्तानातील वाऱ्याने म़ॉन्सूनची वाट अडवली असल्याचे सांगितले जात आहे. कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर मॉन्सून राज्यात दाखल होणार. आता मॉन्सून राज्यात दाखल होण्याची नवी तारीख 20 जून आहे.
कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की, पुन्हा मॉन्सूनच्या पुढील वाटचालीचा प्रवास सुरू होईल. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात एकूण पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यास अर्थेय शेट्टी यांनी हा अंदाज दिला. कोकण, गोवा, आणि मराठवाड्यात 19 जूनदरम्यान केवळ काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पडू शकतो.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह वारे वाहण्याची शक्यता आहे. 17 जूनपर्यंत विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. म्हणजेच जो 15 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होणार होता, तो आता 20 जूला दाखल होईल.
यंदा राज्यात पाऊस कमी पडणार असल्याचा अगोदर अंदाज वर्तवण्यात आला. त्यामध्येच मॉन्सूनची वाटचाल पुढे संथगतीने सुरू आहे. केरळमध्ये दोन दिवस उशिराने मॉन्सून दाखल झाला. मात्र, त्यानंतर अजूनही त्याचा पत्ता नाही. एस निनोचा प्रभाव मॉन्सूनवर आहे. सरकारकडून यादरम्यानच योग्य ती पाऊले या पार्श्वभूमीवर उचचली जात आहेत. मॉन्सूनची तारीख पुढे ढकलली जात असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.
