AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4,4,4,4,4,4,4,4,4,4,6…! कानपूरमध्ये यशस्वी जयस्वालची आक्रमक खेळी, 10 षटकात 100 धावा

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता रंगतदार वळणावर आहे. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असताना वादळी खेळीचं दर्शन घडत आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपल्यानंतर यशस्वी जयस्वालच्या वादळ पाहायला मिळालं.

4,4,4,4,4,4,4,4,4,4,6...! कानपूरमध्ये यशस्वी जयस्वालची आक्रमक खेळी, 10 षटकात 100 धावा
Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 30, 2024 | 2:25 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल लागणार की नाही असा प्रश्न आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे आता दोन दिवसात सामन्याचा निकाल लागणार की नाही? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चौथ्या दिवशी लंचनंतर बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर तंबूत परतला. या धावांचा पाठलाग करत मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान भारतासमोर होतं. त्यामुळे आक्रमक खेळीशिवाय पर्याय नसल्याचं जाणकारांचं म्हणणं होतं. मग काय रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात करून दिली. बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. रोहित शर्माने 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 23 धावा केल्या. पण हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. असं असलं तरी यशस्वी जयस्वाल नावाचं वादळ घोंगावत राहिलं. त्याने बांगलादेशी गोलंदाजांच्या चिंध्या केल्या. कसोटी आहे की टी20 तेच कळेना. पण क्रीडारसिकांचं या खेळीमुळे चांगलंच मनोरंजन झालं.

यशस्वी जयस्वालने 31 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वालने बांगलादेशी गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे भारताच्या नावावर कसोटीत एक विक्रम रचला गेला आहे. 10.1 षटकात संघाच्या 100 धावा झाल्या आहेत. आतापर्यंतचे सर्व विक्रम भारतीय संघाने मोडीत काढले आहेत. यापूर्वीचा विक्रमही भारताच्या नावावर होता. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये 12.2 षटकात 100 धावा केल्या होत्या.

भारताने आज 400 पार धावांचा पल्ला गाठला तर शेवटच्या दिवशी विजयाचं गणित सोपं होऊ शकतं. त्यामुळे आक्रमक खेळण्याशिवाय पर्याय नाही. मोठी धावसंख्या उभारली तर बांगलादेशला शेवटच्या दिवशी प्रतिकार करणं कठीण जाईल. भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील अव्वल स्थान कायम राहील. तसेच अंतिम फेरीचं गणित आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात आणि शेवटच्या दिवशी काय निकाल लागतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.