AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: कर्णधारपदाच्या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने थोडं स्पष्टच उत्तर दिलं

IND vs ENG: जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात नशिबाने कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. टेस्ट कॅप्टन म्हणून त्याचा डेब्यु यशस्वी होऊ शकला नाही.

IND vs ENG: कर्णधारपदाच्या प्रश्नावर जसप्रीत बुमराहने थोडं स्पष्टच उत्तर दिलं
जसप्रीत बुमराहImage Credit source: social
| Updated on: Jul 05, 2022 | 6:53 PM
Share

मुंबई: जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात नशिबाने कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. टेस्ट कॅप्टन म्हणून त्याचा डेब्यु यशस्वी होऊ शकला नाही. कारण एजबॅस्टन कसोटीत (edgbaston test) भारताचा पराभव झाला. कॅप्टन (India Captain) म्हणून बुमराह त्याच्या रणनिती मध्ये थोडा कमी पडला असेल. पण त्याने त्याच्या कामगिरीने मात्र सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्यासाठी त्याचं कौतुकही झालं. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना त्याने 16 चेंडूत 31 धावा फटकावल्या. त्याशिवाय तीन विकेटही काढले. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराहलाच दोन विकेट काढता आले. त्याने अशा टप्प्यावर विकेट काढले की, थोडी विजयाची अंधुकशी आशाही निर्माण झाली होती. पण भारताचा पराभव झाला. कर्णधारपद भुषवताना त्या खेळाडूला स्वत:च्या कामगिरीतून संघासमोर आदर्श घालून द्यायचा असतो. बुमराह त्यात यशस्वी ठरला. पण रणनिती मध्ये त्याला अजून काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील.

कर्णधारपदाच्या प्रश्नावर बुमराह म्हणाला…

प्रथमच कर्णधारपद भुषवणाऱ्या बुमराहला सामन्यानंतर तुला दीर्घकाळ टीम इंडियाचं कर्णधारपद भुषवायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने, “ते मी ठरवू शकत नाही. देशाचं नेतृत्व करायची संधी मिळणं हा सन्मान आहे आणि आव्हानं मला आवडतात” असं बुमराह म्हणाला.

बुमराहने पराभवाचं कारण सांगितलं

“कर्णधार म्हणून भविष्य मी ठरवू शकत नाही. मला जबाबदाऱ्या आवडतात. हे एक चांगलं चॅलेंज होतं. संघाचं नेतृत्व करायला मिळणं ही अभिमानास्पद बाब आहे. हा एक चांगला अनुभव होता” असं बुमराह म्हणाला. पाचव्या कसोटीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाबद्दल बोलताना, हेच कसोटी क्रिकेटच सौंदर्य असल्याचं त्याने सांगितलं. “तीन दिवस भारतीय संघ सरस होता, तरीही पराभव झाला” असं बुमराह म्हणाला. “दुसऱ्याडावात जास्त धावा झाल्या नाहीत, ते महाग पडलं” असं बुमराह म्हणाला. निकाल योग्य आहे. त्याने इंग्लंडच्या संघाचं कौतुक केलं.

मालिकेत बरोबरी साधली

मालिकेतील पाचवी अखेरची कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पहिल्या डावातील भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता, दुसऱ्याडावात ते इंग्लंडला विजयाच्या जवळपासही पोहोचू देणार नाही, असं वाटलं होतं. पण भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.