AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत लॉर्ड्सवर इतिहास रचण्याच्या तयारीत, इंग्लंडवर विजयासाठी 5 विकेट्सची गरज

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराहने 2, इशांत शर्माने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला आहे.

IND vs ENG : भारत लॉर्ड्सवर इतिहास रचण्याच्या तयारीत, इंग्लंडवर विजयासाठी 5 विकेट्सची गरज
जसप्रीत बुमराह
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 9:03 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने रहाणे आणि शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर आता इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य असून इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. मात्र 67 धावांमध्ये त्यांचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतल्याने हा सामना आता भारताच्या बाजूने झुकला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रुटदेखील बाद झाल्याने इंग्लंडच्या या सामन्यातील आशा मावळू लागल्या आहेत. (IND vs ENG : India can defeat England at lords, need 5 more wickets to win after Joe Root dismissal)

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी करत 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 91 धावांची नाबाद भागीदारी केली. त्याआधी कालच्या दिवशी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) आणि चेतेश्वर पुजारा (45) या दोघांनी शतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्यामुळे भारताने आज 8 बाद 298 धावांवर आपला डाव घोषित केला आणि इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंगलंडचा संघ पेलवण्यात असमर्थ ठरतोय असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. कारण भारतीय गोलंदाजांनी 22.3 षटकांमध्ये इंग्लंडची अवस्था 5 बाद 67 अशी केली आहे.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराहने 2, इशांत शर्माने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला आहे. विशेष म्हणजे ज्या जो रुटवर इंग्लंडची भिस्त आहे. तोदेखील बाद झाला आहे. 23 व्या षटकात जसप्रीत बुमराहने जो रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद करुन इंग्लंडचा 5 वा गडी तंबूत धाडला आहे. रुटने 33 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे आता हा सामना वाचवणं इंग्लंडसाठी अवघड जाणार आहे. मोईन अली आणि जॉस बटलर सध्या मैदानावर खेळत असून हेदोघेदेखील चाचपडताना दिसत आहेत.

इतर बातम्या

IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार

(IND vs ENG : India can defeat England at lords, need 5 more wickets to win after Joe Root dismissal)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.