AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: Virat kohli च्या एका निर्णयामुळे नुकसान? 60 धावा बनवूनही विराटच्या चुकीमुळे पाकिस्तान जिंकला?

IND vs PAK: चार वर्षांपूर्वी आशिया कप स्पर्धेत सुरु झालेला टीम इंडियाच्या विजयाचा सिलसिला काल थांबला. चार वर्षांपूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली एकही सामना न गमावता टीम इंडियाने विजेतेपद मिळवलं होतं.

IND vs PAK: Virat kohli च्या एका निर्णयामुळे नुकसान? 60 धावा बनवूनही विराटच्या चुकीमुळे पाकिस्तान जिंकला?
Virat-kohli Image Credit source: AP-PTI
| Updated on: Sep 05, 2022 | 8:05 AM
Share

मुंबई: चार वर्षांपूर्वी आशिया कप स्पर्धेत सुरु झालेला टीम इंडियाच्या विजयाचा सिलसिला काल थांबला. चार वर्षांपूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली एकही सामना न गमावता टीम इंडियाने विजेतेपद मिळवलं होतं. यावेळी सुद्धा भारताने पहिले दोन सामने जिंकले. पण काल टीमला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने सुपर 4 राऊंड मध्ये भारताचा पाच विकेट राखून पराभव केला. टीम इंडियाकडून काल विराट कोहलीने दमदार खेळ दाखवला. पण शेवटच्या षटकातील त्याचा एक प्रयत्न टीमवर भारी पडला? त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय.

सहाव्या ओव्हर मध्ये विराट आला

रविवारी 4 सप्टेंबरला दुबईच्या मैदानात भारत-पाकिस्तान सामना झाला. निर्धारीत 20 ओव्हर्स मध्ये टीम इंडियाने 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. रोहित शर्मा-केएल राहुल या सलामीवीरांच्या जोडीने धमाकेदार सुरुवात दिली. त्यानंतर विराट कोहलीने सूत्र हाती घेतली. सहाव्या ओव्हर मध्ये विराट फलंदाजीसाठी आला. तो शेवटच्या षटकापर्यंत मैदानात होता. त्याने 44 चेंडूत 60 धावा फटकावल्या. त्यामुळे टीमची धावसंख्या 181 पर्यंत पोहोचली.

चांगल्या इनिंग नंतरही विराटकडून चूक?

विराट कोहलीला दुसऱ्याबाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. प्रमुख फलंदाज पॅव्हेलियन मध्ये परतत होते. 20 व्या ओव्हर मध्ये बाबर आजमने हॅरिस रौफच्या हाती चेंडू सोपवला. कोहलीसोबत भुवनेश्वर कुमार क्रीजवर होता. भुवनेश्वर बऱ्यापैकी फलंदाजी करु शकतो. रौफने आपल्या गोलंदाजीच्या वेगात बदल करुन कोहलीला चांगलच सतावलं. या दरम्यान त्याने विराटला पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले.

भुवनेश्वरही चौकार मारु शकला असता

ओव्हर मधील दुसऱ्या चेंडूवर विराटकडे सिंगल धाव घेण्याची संधी होती. पण त्याने एकेरी धाव घ्यायला नकार दिला. इथे कोहलीचं भुवनेश्वर विश्वास न दाखवणं कदाचित संघासाठी थोडं महाग पडलं. त्यामुळे संघाच्या धावसंख्येत आणखी एका रन्सची भर पडली असती. भुवनेश्वरही चौकार मारु शकला असता.

कोहलीचं सिंगल धाव न घेणं आश्चर्यकारक होतं. कारण त्याने संपूर्ण इनिंग मध्ये बाऊंड्रीपेक्षा एकेरी-दुहेरी धावा पळून रन्स बनवले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा प्रत्येक चेंडूवर धाव मिळवण्याचा प्रयत्न असतो.

कोहली बाऊंड्री मारु शकला नाही

कोहली चौथ्या चेंडूवरही बाऊंड्री मारु शकला नाही. नाईलाजाने त्याला दोन धावांसाठी पळावं लागलं. त्यात तो रनआऊट झाला. ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूंवर पाकिस्तानने सुमार क्षेत्ररक्षण केलं. त्यामुळे रवी बिश्नोईला 2 चौकार मिळाले. 20 षटकांच्या अखेरीस टीम इंडियाने 181 धावांच डोंगर उभा केला होता. पाकिस्तानने लास्ट ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विजय मिळवला. अशा परिस्थितीत निर्धाव चेंडू आणि अतिरिक्त रन्सही सुद्धा जय-पराजयात महत्त्वाचे ठरतात.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती