AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : बॉलिंग की फिल्डिंग? कॅप्टन केएलने भारताच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं? म्हणाला…

KL Rahul Post Match Presentation: टीम इंडियाचे गोलंदाज रायपूरमध्ये 358 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले. भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन केएल राहुल याने काय म्हटलं? जाणून घ्या.

IND vs SA : बॉलिंग की फिल्डिंग? कॅप्टन केएलने भारताच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं? म्हणाला...
KL Rahul Post Match PresentationImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 03, 2025 | 11:46 PM
Share

भारताला रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने एडन मार्रक्रम याच्या शतकी खेळीच्या जोरावर 359 धावांचं आव्हान हे 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या जोडीने शतक करुन भारताला 350 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र एडन मार्रक्रम याचं शतक आणि इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विदेशात सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल याने चुकांवर बोट ठेवलं. भारताचं नक्की कुठे चुकलं? याबाबत केएलने प्रतिक्रिया दिली.

भारताच्या पराभवाला दव (Dew) प्रमुख कारण असल्याचं केएलला वाटतं. ड्यू फॅक्टर लक्षात घेत बॉलिंग किती अवघड होती? यावर केएल व्यक्त झाला. “हे अवघड नाही, कारण ड्यू फार जास्त आहे. तसेच दुसऱ्या डावात बॉलिंग करणं फार अवघड आहे. आम्ही गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती” , असं केएलने म्हटलं.

“पंचांनी बॉल बदलण्यात चांगली भूमिका बजावली. तसेच टॉस फार निर्णायक भूमिका बजावतो. टॉस गमावल्याने मी स्वत:ला दोष देत आहे”, असंही केएलने म्हटलं. या मालिकेतील दोन्ही सामन्यात केएलच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला.

केएल फिल्डिंगबाबत काय म्हणाला?

टीम इंडियाला चांगली फिल्डिंग करायला हवी होती, हे केएलने मान्य केलं. यशस्वी जैस्वाल याने एडन मार्रक्रम याचा कॅच सोडणं भारताला चांगलंच महागात पडलं.

“काही गोष्टी आहेत ज्या आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने करु शकतो. 350 ही धावंसख्या ओके वाटत होती. मात्र गोलंदाजांना बचाव करण्यासाठी आणखी 20-25 धावा कशा करता येतील? यावर ड्रेसिंग रुममध्ये चर्चा झाली”, असं केएलने नमूद केलं.

केएलने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली याच्या शतकाबाबत प्रतिक्रिया दिली. “ऋतु आणि विराटला बॅटिंग करताना पाहणं फार चांगलं होतं. तो त्याचं काम करत असतो. मात्र ऋतु फिरकी गोलंदाजांचा कसा सामना करतो हे पाहायचंय. ऋतुराजने ज्या वेगाने धावा केल्या त्यामुळे 20 धावा अतिरिक्त मिळाल्या”, असं केएल म्हणाला.

केएलला लोअर ऑर्डरकडून अपेक्षा

दरम्यान केएलने लोअर ऑर्डरमधील फलंदांजाकडून थोड्याफार धावांची आशा व्यक्त केली. “जर खालच्या फळीतील फलंदाजांनी आणखी थोडं योगदान देऊ 2 चौकार मारले असते, तर कदाचित 20 धावांमुळे आनंद वाटला असता”, असं म्हणत केएलने भविष्यात लोअर ऑर्डरमधील फलंदाजांकडून धावांची आशा व्यक्त केली आहे..

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?