IND vs SA 3rd T20: आजच्या मॅचमध्ये पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान

सीरीज जिंकली पण टीम इंडियासाठी आजचा सामना का महत्त्वाचा आहे

IND vs SA 3rd T20: आजच्या मॅचमध्ये पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान
टीम इंडियाImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 4:22 PM

मुंबई: टीम इंडियाचा आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमधील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. टीम इंडियाने मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या मॅचसाठी केएल राहुल आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि मिस्टर 360 सूर्यकुमार यादव या मॅचमध्ये खेळतील. आज मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

हवामान कसं असेल?

तिसरा शेवटचा टी 20 सामना इंदूरमध्ये होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. त्यावेळी पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सोमवारी टीम इंडिया इंदूरमध्ये दाखल झाली. त्यावेळी पावसानेच त्यांचे स्वागत केले.

हा सामना का महत्त्वाचा?

टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. पण हा तिसरा सामना सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.

दोन प्लेयर्सना मिनी ब्रेक

टीम ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी विराट कोहली आणि केएल राहुलला तीन दिवसांचा मिनी ब्रेक देण्यात आलाय. दोघेही तिसऱ्या मॅचमध्ये खेळताना दिसणार नाही. विराट कोहली मुंबईला रवाना झालाय. राहुल बंगळुरुला गेलाय.

हाय स्कोरिंग मॅचेस

होळकर स्टेडियमवर ही मॅच होईल. या विकेटवर चेंडूला चांगला बाऊन्स मिळतो. या स्टेडियममध्ये बाऊंड्री छोटी आहे. याआधी या मैदानावर मोठ्या धावसंख्येच्या मॅचेस झाल्या आहेत. याच ग्राऊंडवर रोहित शर्माच्या 118 धावांसह टीम इंडियाने 260 धावांपर्यंत मजल मारलीय.

तिसऱ्या टी 20 संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह/मोहम्मद सिराज

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.