IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला

भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे पहिला कसोटी सामना असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झाला. लंच ब्रेकनंतर भारतीय संघ मैदानात उतरला. 288 धावांच्या पुढे खेळताना भारताला अडचणींचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या फिरकीचा सामना करताना भारतीय संघ अडचणीत आला.

IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
IND vs SL : दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 460 धावा, ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे डाव सावरला
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 6:23 PM

भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर पकड मिळवली पण धावगतीला काही अंशी ब्रेक लागला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 9 गडी गमवून 460 धावा केल्या आहे. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी 43 षटकांचा खेळ झाला आणि 172 धावा आल्या. त्यात श्रीलंकेने फिरकीच्या जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघ पहिल्या डावात 2 गडी गमवून 288 धावांवर खेळत होता. पण या धावांचा पुढे खेळताना भारताच्या धडाधड सात विकेट पडल्या. भारताने अवघ्या 172 धावा करताना 7 विकेट गमवल्या आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव 12 आणि प्रसिद्ध कृष्णा 1 या धावसंख्येवर नाबाद तंबूत परतले. आता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय किती धावा करणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

भारताकडून देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत ही जोडी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरली होती. पण पावसामुळे खेळपट्टीचा पूर्ण अंदाजच बदलून गेला होता. ऋषभ पंत चुकीचा फटका मारताना 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला केएल राहुल आला. रिटायर्ड हर्ट होऊन पहिल्या दिवशी 77 धावा करून गेला होता. त्या पुढे खेळताना त्या फक्त 5 धावा जोडल्या आणि 82 धावा करून तंबूत परतला. देवदत्त पडिक्कलने 150 धावांचा पल्ला ओलांडत धावसंख्येत भर घातली. पण त्याचा खेळही 167 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेलकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण रवींद्र जडेजा 13 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे भारताची स्थिती नाजूक झाली. असं असताना ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने डाव सावरल्याने भारताने मजबूत स्थितीत आला.

ध्रुव जुरेल आणि मानव सुथारने सातव्या विकेटसाठी 66 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलने 68 चेंडूत 51 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर लगेचच मानव सुथारही 24 धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजचा खेळ 11 धावांवर आटोपला. त्यामुळे भारत सर्वबाद होतो की काय असा प्रश्न होता. पण कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी झुंज दिली. आता तिसऱ्या दिवशी ही जोडी पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 4, केशारा नुवांथाने 3 आणि असिथा फर्नांडोने 1 विकेट काढली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us