IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघ धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेसमोर आता विजयासाठी धावांचं आव्हान आहे. आता भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. खासकरून फिरकी गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली आहे.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली
IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 18, 2026 | 2:40 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावात 178 धावांची मोठी आघाडी टीम इंडियाला मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने 200 पार धावा करण्याची अपेक्षा होती. पण खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत करणारी असल्याने हे गणित कठीण असल्याचं दिसून आलं. भारताचा दुसऱ्या इनिंगमधील डाव अवघ्या 193 धावांवर आटोपला. या सामन्यातील दुसऱ्या डावात केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत वगळता सर्वांनी निराशा केली. भारताने 371 धावांचं ठेवलेलं आव्हान तसं पाहिलं तर सोपं नाही. पण भारतीय गोलंदाजांना आता भूमिका बजवावी लागणार आहे.

दुसऱ्या डावात 178 धावांच्या आघाडीच्या पुढे खेळताना भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने पहिल्याच षटकात विकेट दिली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 35 धावा करून बाद झाला आणि गणित बिघडलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिल 8 धावाच करू शकला. देवदत्त पडिक्कलचा डावही 44 धावांवर आटोपला. पण पहिल्या डावात फेल गेलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या डावात झुंजार खेळी केली. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या आणि बाद झाला.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. ध्रुव जुरेल 7, रवींद्र जडेजा 9, मानव सुथार 9, कुलदीप यादव 5 धावा करून बाद झाले. त्यामुळे भारताची नाजूक स्थिती झाली. प्रसिद्ध कृष्णा 2 धावा करून बाद झाला आणि भारताचा डाव 193 धावांवर आटोपला. आता भारतीय फिरकीची जबाबदारी वाढली आहे. दीड दिवसांचा खेळ शिल्लक असून श्रीलंकेला विजयी धावांच्या आता गुंडाळण्याचं आव्हान असणार आहे. जर तसं झालं तर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us