AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs WI : पहिल्याप्रमाणेच दुसरी वनडेही रोमहर्षक! अखेरच्या ओव्हरमध्ये भारताचा दणदणीत विजय, मॅचसह मालिकाही खिशात घातली

श्रेयस-संजूनेही अर्धशतक झळकावलं. विंडीज संघानं 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपनं कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने कर्णधारपदी 74 धावांची खेळी खेळली. अधिक जाणून घ्या

Ind Vs WI : पहिल्याप्रमाणेच दुसरी वनडेही रोमहर्षक! अखेरच्या ओव्हरमध्ये भारताचा दणदणीत विजय, मॅचसह मालिकाही खिशात घातली
अक्षर पटेलने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध 35 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या Image Credit source: social
| Updated on: Jul 25, 2022 | 7:40 AM
Share

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Ind Vs WI) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतानं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा प्रकारे भारतानं मालिकेवरही कब्जा केला आहे. भारतीय संघानं (Indian cricket team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 चेंडू राखून 2 गडी राखून पराभव केला. क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटमध्ये यजमान वेस्ट इंडिजचा हा सलग 8वा पराभव आहे. याआधी , टीम इंडियानं शेवटची वनडे 3 धावांच्या थोड्या फरकानं जिंकली होती. वेस्ट इंडिजविरुद्धची (WI) मालिकाही जिंकून भारतानं आपल्या बेंच स्ट्रेंथची ताकद दाखवून दिली आहे. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं भारतासमोर 312 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 2 चेंडू आधीच 8 विकेट्सनं पूर्ण केलं आहे. अशाप्रकारे वेस्ट इंडिजनं केवळ ही मालिका गमावली नाही तर 2019 च्या विश्वचषकानंतर प्रथम फलंदाजी करताना सामने गमावण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला आहे.

बीसीसीआयचं ट्विट

शेवटच्या 10 षटकात 100 धावा

विजयासाठी 312 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं शेवटच्या 10 षटकांत केवळ 100 धावा केल्या. 2001 नंतर शेवटच्या 10 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करताना ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. या वेगवान खेळाचा परिणाम म्हणजे भारतीय संघाला पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर धडक मारता आली.

अक्षर पटेल पुन्हा फॉर्मात

भारताकडून श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी संघाचा पाया रचण्याचं काम केलं. मात्र फॉर्ममध्ये पुनरागमन करणाऱ्या अक्षर पटेलनं जोरदार धमाका केला. त्याने ती 35 चेंडूत स्फोटक खेळी खेळली. यामुळे टीम इंडियाला विजय मिळवून दिला. डावखुरा अक्षर पटेलनं 5 षटकार आणि 3 चौकारांसह 64 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून देऊनच तो परतला. या अतुलनीय खेळीसाठी तो सामनावीर म्हणून निवडला गेला.

बीसीसीआयचं ट्विट

श्रेयस-संजूचं अर्धशतक

श्रेयस-संजूनेही अर्धशतक झळकावलं आणि विंडीज संघानं 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. शाई होपनं कारकिर्दीतील 100 वा वनडे खेळताना 115 धावा केल्या. निकोलस पूरनने कर्णधारपदी 74 धावांची खेळी खेळली. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि आवेश खान विकेट घेण्यात अपयशी ठरले.

आवेशचा हा डेब्यू वनडे होता आणि तो चांगलाच महागात पडला. त्यानं 6 षटकात 54 धावा दिल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं 49.4 षटकांत 8 गडी गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर (63), संजू सॅमसन (54) आणि शुभमन गिलने 43 धावा केल्या.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.