AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : चौथ्या टी20 सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? हवामान आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात चौथा टी20 सामना शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर मालिका खिशात टाकणार आहे. तर झिम्बाब्वे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान हरारेची खेळपट्टी कोणाला मदत करणारी आहे ते जाणून घेऊयात.

IND vs ZIM : चौथ्या टी20 सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? हवामान आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या
| Updated on: Jul 12, 2024 | 11:07 PM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिका विजयासाठी आणि झिम्बाब्वेला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चौथा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा काही बदल नसेल. कारण तिसऱ्या सामन्यात बरंच डोकेफोडी करून खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं गेलं आहे. फार तर खलील अहमदच्या जागी मैदानात मुकेश कुमारला संधी मिळू शकते. या व्यतिरिक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणं खूपच कठीण दिसत आहे. तरी कर्णधार शुबमन गिल कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे. दरम्यान स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता आणि भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. अक्युवेदरच्या अहवालानुसार, या दिवशी तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. सामन्यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 9 किमी असू शकतो. म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही.

मागच्या तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकूण 44 सामने खेळले असून त्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 24 वेळा जिंकला आहे. तर 18 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. या मैदानावर सरासरी धावसंख्या ही 160 च्या आसपास राहिली आहे. त्याच्यावर धावा केल्या तर गाठणं कठीण होतं असं दिसतंय.

दोन्ही संघांचे खेळाडू

टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), यशवी जयस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, रियान पराग, ध्रुवा जुरेल, खलील अहमद, तुषार देशपांडे .

झिम्बाब्वे संघ : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट केया, क्लाइव्ह एम, वेस्ली मेदवेरे, टी मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रेंडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, नाताम कुमारी, डेनिश मायबानी , रिचर्ड अंगारावा, मिल्टन शुम्बा.

Follow Us
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर