AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC: वर्ल्ड कपआधी राहुल द्रविड यांनी BCCI कडे केली खास मागणी

राहुल द्रविड यांनी काय मागणी केलीय? काय आहे त्यांची विनंती?

T20 WC: वर्ल्ड कपआधी राहुल द्रविड यांनी BCCI कडे केली खास मागणी
Rahul dravidImage Credit source: AFP
| Updated on: Sep 20, 2022 | 12:02 PM
Share

मुंबई: T20 World CUP साठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणारी टी 20 सीरीज त्याच तयारीचा भाग आहे. हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी मागचे काही महिने टी 20 टीममध्ये सातत्याने प्रयोग केले. त्यातून वर्ल्ड कपसाठी टीम निवडली आहे. कागदावर टीम इंडिया बळकट वाटतेय.

तो एक वेकअप कॉल

फलंदाजी, गोलंदाजी आणि ऑलराऊंडर्समुळे टीम संतुलित दिसतेय. पण नुकत्याच संपलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या कमकुवत बाजू उघड झाल्या. आशिया कप टीम इंडियासाठी एक वेकअप कॉल होता. आपण कशात कमी पडतोय, ते यातून दिसून आला. याच पार्श्वभूमीवर हेड कोच राहुल द्रविड यांनी बीसीसीआयकडे एक खास विनंती केली आहे.

द्रविड यांनी काय विनंती केली?

यंदा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार आहे. तिथल्या वातावरणात रुळण्यासाठी, तयारीसाठी टीमला लवकर ऑस्ट्रेलियात पाठवण्याची विनंती द्रविड यांनी बीसीसीआयला केली आहे. टीम इंडियासाठी जास्तीत जास्त सराव सामने आयोजित करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. जेणेकरुन खेळाडूंना ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा अंदाज येईल.

कधी रवाना होणार टीम इंडिया?

याआधी टीम इंडिया 9 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होती. पण द्रविड यांच्या विनंतीनंतर टीम इंडिया आता 5 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, टीम इंडिया आता आणखी 2 ते 3 सराव सामने ऑस्ट्रेलियात खेळणार आहे.

कोणाबरोबर बोलणी सुरु?

“आयसीसीने काही वॉर्म-अप मॅचेस आयोजित केल्या आहेत. त्याशिवाय आणखी सराव सामने खेळण्यासाठी आमची काही टीम्स बरोबर बोलणी सुरु आहेत. द्रविड आणि सपोर्ट स्टाफसह संपूर्ण टी 20 वर्ल्ड कप टीम 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल” असं बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना कधी?

नेट बॉलर्स आणि स्टँडबाय खेळाडूंसह टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, असं वृत्त इनसाइड स्पोर्ट्ने दिलं आहे. इंदूर येथे 4 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना होणार आहे, त्यानंतर टीम इंडिया लगेच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.