AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 वर्ल्ड कपसाठी 13 क्रिकेटपटू ठरले, फक्त 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा

पुढच्या 15 दिवसात T 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World cup) संघ निवडला जाणार आहे. BCCI च्या निवड समितीला कुठल्या 15 खेळाडूंची निवड केली, ते आयसीसीला कळवावं लागणार आहे.

T 20 वर्ल्ड कपसाठी 13 क्रिकेटपटू ठरले, फक्त 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा
टीम इंडिया (फाईल फोटो)Image Credit source: Google
| Updated on: Aug 31, 2022 | 8:46 AM
Share

मुंबई: पुढच्या 15 दिवसात T 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World cup) संघ निवडला जाणार आहे. BCCI च्या निवड समितीला कुठल्या 15 खेळाडूंची निवड केली, ते आयसीसीला कळवावं लागणार आहे. आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड होईल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन रोहित शर्मा सोबत मुंबईत बैठक होईल. त्यातून संघ निवडला जाईल. टीम इंडियासाठी एक चांगली बाब म्हणजे, टी 20 वर्ल्ड कपसाठी 13 खेळाडू जवळपास निश्चित आहेत. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलची दुखापत ही टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघात 2 जागांसाठी 5 खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा आहे.

भारताकडे पर्याय आहेत, पण….

दोघे पूर्णपणे फिट आहेत किंवा नाही, हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतरच समजेल. भारताकडे पर्याय आहेत, पण त्यांच्याकडे तितका अनुभव नाही. बुमराह आणि हर्षल पटेल दोघे अनफिट ठरले, तर मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. मोहम्मद शमीचं वय लक्षात घेऊन त्याचा टी 20 टीमसाठी विचार होत नाही. पण त्याचा अनुभव लक्षात घेता, बुमराह नसल्यास त्याला प्राधान्य मिळू शकतं. मोहम्मद शमी कसोटी आणि वनडे मध्ये भारताचा प्रमुख गोलंदाज आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

टी 20 वर्ल्ड कपला अजून अडीच महिने बाकी आहेत. त्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका होणार आहेत. “80 ते 90 टक्के संघ ठरला आहे. तीन ते चार बदल होऊ शकतात. परिस्थितीवर सगळं अवलंबून आहे” असं रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलय.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी