AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN Test Day 1 Report: पुजारा-अय्यर लढले, पहिल्या दिवसअखेर अशी आहे स्थिती

IND vs BAN Test Day 1 Report: दिवसाची सुरुवात टीम इंडियासाठी मनासारखी झाली नाही, पण....

IND vs BAN Test Day 1 Report: पुजारा-अय्यर लढले, पहिल्या दिवसअखेर अशी आहे स्थिती
Shreyas iyer-cheteshwar pujaraImage Credit source: BCCI
| Updated on: Dec 14, 2022 | 5:06 PM
Share

ढाका: बांग्लादेश विरुद्ध पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने दमदार खेळ दाखवला. या दोघांच्या इनिंगच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 278 धावा केल्या आहेत. चटोग्रामच्या जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर हा कसोटी सामना सुरु आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या कसोटीत टीमच नेतृत्व करतोय. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीमला चांगली सुरुवात मिळाली नाही. पण अय्यर आणि पुजाराने टीमचा डाव सावरला. बांग्लादेशने दिवसाअखेरीस 85 व्या व 90 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन भारतावर दबाव वाढवलाय.

पंतची छोटी पण महत्त्वाची इनिंग

दिवसाचा खेळ संपताना श्रेयस अय्यर 82 धावांवर नाबाद होता. उद्या त्याच्यावर टीम इंडियाची भिस्त असेल. दिवसाच्या अखेरीस मेहदी हसन मिराजने अक्षर पटेलला (14) आऊट केलं. पुजारा 89 धावांवर बाद झाला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 203 चेंडूंचा सामना केला. 11 चौकार मारले. ऋषभ पंत छोटी पण आक्रमक इनिंग खेळून गेला. त्यामुळे टीमवरील दबाव कमी झाला. पंतने 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.

ताइजुलने वाढवल्या अडचणी

कॅप्टन राहुल आणि सलामीवीर शुभमन गिल टीमला चांगल्या सुरुवातीकडे घेऊन जात होते. पण 41 धावांवर ताइजुल इस्लामने गिलला बाद केलं. त्याने 20 रन्स केल्या. त्यानंतर खालीद अहमदने राहुलला बोल्ड केलं. राहुलने 22 धावा केल्या. तीन धावांनंतर विराट कोहलीला ताइजुलने बाद केलं. कोहलीने फक्त एक रन्स केला.

पंतने यानंतर पुजारासोबत मिळून डाव सावरला. पुजारा संयमी फलंदाजी करत होता. त्याचवेळी पंतने वेगाने धावा बनवून बांग्लादेशवरील दबाव वाढवला. मेहेदी हसन मिराजच्या चेंडूवर तो बाद झाला.

पुजारा आणि अय्यरने सावरला डाव

त्यानंतर अय्यर आणि पुजाराने डाव सावरला. दोघांनी व्यवस्थितपणे बांग्लादेशी गोलंदाजांचा सामना केला. दोघांनी चांगले स्ट्रोक्स मारुन अर्धशतक पूर्ण केलं. 112 वरुन त्यांनी टीमची धावसंख्या 261 पर्यंत पोहोचवली. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने कसोटीच्या पहिल्यादिवशी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 6 बाद 278 धावा झाल्या आहेत. पुजाराने 203 चेंडूत 90 धावा आणि श्रेयस अय्यरने 169 चेंडूत 82 रन्स केल्या आहेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.