AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : इंडिया-बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs Bangladesh Test Series 2024 Schedule: टीम इंडिया महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आता कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानला त्यांच्याच घरात 2-0 ने पराभूत करणाऱ्या बांगलादेशचं आव्हान असणार आहे.

IND vs BAN : इंडिया-बांगलादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
bangladesh cricket team
| Updated on: Sep 11, 2024 | 1:24 AM
Share

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेश क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश या दौऱ्यात कसोटीसह टी 20i मालिकाही खेळणार आहे. मात्र कसोटी मालिकेची सर्वाधिक चर्चा होत आहे, त्याचं कारणही तसंच आहे. विराट कोहली याचं जानेवारी 2024 नंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत याची 2 वर्षांनी एन्ट्री झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये विराट आणि पंतचा खेळ पाहण्याची उत्सुकता आहे. आपण कसोटी मालिकेचं वेळापत्रक आणि सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील? हे जाणून घेऊयात.

उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पहिला सामना हा 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. तर त्यानंतर 4 दिवस सामन्याची सुरुवात 9 वाजून 30 मिनिटांनी होईल. त्यानंतर दुसरा आणि अंतिम सामना हा 28 सप्टेंबरपासून होणार आहे. हा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियम येथे होणार आहे.

रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्व

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्ड येत्या काही दिवसातच संघाची घोषणा करेल. बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. त्यामुळे बांगलादेशचा विश्वास वाढलेला आहे. अशात टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली