AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणं महत्त्वाचं, कारण की…

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना ओव्हल मैदानात होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. असं असताना नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा आहे.

IND vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणं महत्त्वाचं, कारण की...
पाचव्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणं महत्त्वाचं, कारण की... Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 30, 2025 | 3:37 PM
Share

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले आहेत. या मालिकेतील चौथा सामना ड्रॉ झाल्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. इंग्लंडने चार सामन्यानंतर आघाडीवर आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात भारताला काहीही करून विजय मिळवावा लागेल. कारण हा सामना ड्रॉ किंवा इंग्लंडने जिंकला तर मालिका त्यांच्या खिशात जाईल. 31 जुलैपासून ओव्हल मैदानात हा सामना सुरु होणार आहे. टीम इंडिया शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्नात आहे. पण या सामन्यात वरुणराजाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण या कसोटी सामन्यातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा राहील. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात कर्णधार शुबमन गिलच्या पदरी अपयश पडलं आहे. एकदाही नाणेफेकीचा कौल बाजूने लागला नाही. पण पाचव्या सामन्यात नाणेकैकीचा कौल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

पहिल्या दिवशी ओव्हलवर 20 टक्के पावसाची शक्यता असणार आहे. आकाश ढगाळ असेल, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना खूप मदत होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. या दिवशी तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हे दोन दिवस फलंदाजांसाठी चांगले असतील. चौथ्या दिवशीही हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. शेवटच्या दिवशी पुन्हा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला धावांचा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे सामन्यात नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचं आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल.

पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही खेळपट्टी फलंदाजांच्या बाजूने बदलेल. ओव्हलची खेळपट्टी पहिल्या दोन दिवसांत वेगवान गोलंदाजांना मदत करते, तसेच उसळी मिळते. सामना जसजसा पुढे सरकतो तसतसे खेळपट्टीवर भेगा दिसू लागतात. यामुळे फिरकी गोलंदाजांना खूप मदत होते. अलिकडच्या कसोटी सामन्यांमध्ये ओव्हलमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 350-400 च्या दरम्यान आहे.

या खेळपट्टीवर आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 8 वेळा विजय मिळवला आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी 6 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. 2021 मध्ये इंग्लंडने या मैदानावर टीम इंडियाचा 157 धावांनी पराभव केला होता. पण आता पावसाची स्थिती पाहता प्रथम गोलंदाजी करणं सोयीचं ठरेल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.