
अखेर वैभव सूर्यवंशी याच्या वादळी खेळीचा शेवट झाल आहे. त्यामुळे वैभवची द्विशतकाची संधी हुकली आहे. वैभवने 15 सिक्स आणि 15 फोरसह 80 बॉलमध्ये 175 रन्स केल्या.
वैभव सूर्यवंशी याने फायनलध्ये धमाका केला आहे. वैभवने इंग्लंड विरुद्ध दीडशतक झळकावलं आहे. वैभवे षटकार झळकावत दीडशतक पूर्ण केलं. वैभवने 32 चेंडूत अर्धशतक आणि त्यानंतर 55 चेंडूत शतक पूर्ण केलं. वैभवने त्यानंतर फक्त 16 चेंडूत 50 धावा जोडत दीडशतक झळकावलं. वैभव असाच खेळत राहिला तर तो सहज द्विशतक पूर्ण करेल.
टीम इंडियाचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावलं आहे. वैभवने चौकार आणि षटकारांचा मदतीने अवघ्या 55 चेंडूत शतक झळकावलंय.
इंग्लंडने भारताला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. कर्णधार आयुष म्हात्रे अर्धशतकानंतर दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. आयुषने सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. मात्र आयुष त्यानंतर आऊट झाला. आयुषने 51 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. तसेच वैभव आणि आयुष या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 बॉलमध्ये 142 रन्सची पार्टनरशीप केली.
टीम इंडियाचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने वादळी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर वैभवने गिअर बदलत चौफेर फटकेबाजी केली. आता वैभव शतकात्या उंबरठ्यावर आहे. वैभव 18 ओव्हरनंतर 97 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. तर टीम इंडियाने 1 विकेट गमवून 152 धावा केल्या आहेत. आयुष 45 चेंडूत नाबाद 43 धावांवर खेळत आहे.
मालेगावचे वरिष्ठ नेते ओवीसी यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. जातीयवादी शक्तींना (@BJP4Maharashtra आणि@Shivsenaofc) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडियाचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने अंतिम सामन्यात संयमी सुरुवात केली आहे. वैभवने इंग्लंडने विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
भारताने अंतिम सामन्यात ॲरॉन जॉर्ज याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याची साथ देण्यासाठी कॅप्टन आयुष म्हात्रे मैदानात आला. आता ही जोडी सेट झालीय. भारताने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 79 धावा केल्यात. वैभव 42 तर आयुष 26 धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने भारताला पहिला झटका दिला आहे. ॲलेक्स ग्रीन याने ॲरॉन जॉर्ज याला आऊट केलं आहे. ॲरॉनने 11 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. ॲरॉनने उपांत्य फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध शतकी खेळी करुन भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती.
भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि ॲरॉन जॉर्ज ही सलामी जोडी मैदानात आली आहे. या दोघांवर भारताला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी आहे. हे दोघे कशी सुरुवात करतात, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकलाय. कर्णधार आयुष म्हात्रे याने फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताने अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.
इंग्लंड विरुद्ध इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंग्लंडने सर्वात आधी अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. इंग्लंड आता भारतासमोर कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर मात करत फायनलमध्ये धडक दिली होती. ॲरॉन जॉर्ज याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 300 पेक्षा अधिक धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं. त्याआधी टीम इंडिया बाद आणि साखळी फेरीत अजिंक्य होती.
बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेस, थॉमस रेव (कर्णधार), कॅलेब फाल्कनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लम्सडेन, ॲलेक्स फ्रेंच, ॲलेक्स ग्रीन, आयझॅक मोहम्मद, ल्यूक हँड्स, विल बेनिसन आणि अली फारूक.
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान, उद्धव मोहन आणि किशन कुमार सिंग.
अंडर 19 टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. भारताची ही या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची एकूण दहावी तर सलग सहावी वेळ ठरली आहे. भारतासमोर अंतिम सामन्यात इंग्लंडचं आव्हान आहे.
भारत-इंग्लंड अंतिम सामन्यासाठी सज्ज
It’s time for a massive showdown! 🔥
Who will take away the coveted trophy at the #U19WorldCup 2026 🏆
Find out how to watch 👉 https://t.co/xPyPKzGMQU pic.twitter.com/gdZopID6Pk
— ICC (@ICC) February 6, 2026
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. भारताने यंदाही अंतिम फेरीत पोहचण्याची मालिका कायम ठेवलीय. टीम इंडियासमोर फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान आहे. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य आहेत. आता दोन्ही संघ वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहेत. भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इंग्लंड टीम इंडियाचं आव्हानाचा सामना करण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील घडामोडींबाबत लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.