AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022: क्रिकटपटूंचा सल्ला, पाकिस्तान संघाला हलकं समजू नका..

भारताचे माजी खेळाडू आणि झिम्बाब्वेचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना वाटते की कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारत-पाकिस्तान सामना हा प्रत्येकासाठी अनेक सामन्यांचा आनंद देऊ शकतो. 'मीही इतर भारतीयांप्रमाणेच या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Asia Cup 2022: क्रिकटपटूंचा सल्ला, पाकिस्तान संघाला हलकं समजू नका..
| Updated on: Aug 27, 2022 | 3:12 PM
Share

नवी दिल्लीः आशिया चषक (Asia Cup 2022)आणि क्रिकेटमधील विक्रमा यांचा जवळचा संबंध आहे. भारत हा सगळ्याच दृष्टीने पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. दोन वेळा पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडून 7 वेळा ही स्पर्धा जिंकण्यात आली आहे, परंतु भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या म्हणण्यानुसार मेन इन ब्लूकडे फक्त किरकोळ आघाडी तर आहे कारण कारण खेळही महत्वाचाच आहे. भारताकडून 2019 पासून टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटच्या 16 पैकी 12 आणि शेवटच्या 23 पैकी 19 सामने जिंकण्यात आले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानने (Pakistan Team) शेवटच्या टी-20 सामन्यातील 29 पैकी 20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले गेले आहेत. दोन्ही संघांची तुलना केल्यास, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध 7-2 (Indai-Pakistan Match) असा विक्रम आहे.

पाकिस्तानचे आव्हान भारतासाठी सोपे नाही

माजी भारतीय निवड चाचणीतील सबा करीमने TV9 स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, मी रविवारी होणाऱ्या एका रोमांचक सामन्याची वाट बघत आहे. ते दोन्ही संघ खूप दिवसांनी खेळत असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी ही चांगली गोष्ट आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा सगळ्यांसाठी महत्वाची आहे.

या सामन्यातील रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्याकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कारण ते कोणत्याही संघाविरुद्ध प्रभावी आणि जोरदारपणे खेळू शकणारे खेळाडू आहेत.

आफ्रिदीशिवायही संघ चांगला

सध्याच्या क्रिकेटमध्ये ‘पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज शाहीन आफ्रिदी खेळत नसला तरी त्याचा संघ चांगला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. त्यांची फलंदाजी मजबूत आणि उत्कृष्ट असल्यानेच त्यांची गोलंदाजी समोरच्यांसाठी नेहमीच धोकादायक ठरली आहे. या सामन्यात रोहित अँड कंपनीला त्याच्याविरुद्ध आक्रमक व्हावे लागणार आहे, कारण त्या संघानेही जोरदार तयारी केली आहे.

पाक गोलंदाजांचे आक्रमण अप्रतिम

1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य मदन लाल यांनी सांगितले की, टी-20 क्रिकेटमध्ये हा कोणाचाही खेळ असू शकतो. त्यांनी सांगितले की, कागदावर भारत एक चांगला संघ असला तरी मैदानावरची आणि कागदावरची लढाई लक्षात घेतली गेली पाहिजे.टी-20 क्रिकेटमध्ये कोणताही संघ जिंकू शकतो, हेही काही दिवसांपूर्वी सिद्ध झाले आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांचे आक्रमण नेहमीच जबरदस्त राहिले असले तरी भारतीय खेळाडूंचा खेळही त्यांच्याच तोडीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारताकडे उत्कृष्ट बॉलर्स

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी व्यवस्थापक अब्बास अली बेग यांनी सांगितले की, हा सामना खूप मनोरंजक असणार आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध चांगलेच लढू शकतात. आम्ही समजतो की सध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत भाग घेऊ शकत नाहीत, परंतु आशिया चषकसारख्या मालिकेत हा सामना होणार असल्याने अनेक जण त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणाले की, मला वाटते की भारताने हा सामना जिंकला पाहिजे. भारताकडे काही चांगले फलंदाज आणि उत्कृष्ट बॉलर्स आहेत. त्यांच्यामुळे धावा रोखल्या जाऊ शकता. पाकिस्तानकडेही काही उत्कृष्ट खेळाडू आहेत, पण त्यांच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत भारताइतकी जबरदस्त असे खेळाडू नाहीत.

पाकिस्तानला हलकं समजू नका

भारताचे माजी खेळाडू आणि झिम्बाब्वेचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना वाटते की कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारत-पाकिस्तान सामना हा प्रत्येकासाठी अनेक सामन्यांचा आनंद देऊ शकतो. ‘मीही इतर भारतीयांप्रमाणेच या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. आशिया चषक आणि T20 क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानवर निश्चितच बाजी मारणार असा विश्वसासही त्यांनी यावेळी व्यक्त केला असला तरी पाकिस्तानला तुम्ही हलक्यात घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.