AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: आजच्या तिसऱ्या T 20 मॅचसाठी अशी असू शकते Playing 11, पुण्याच्या मुलाला वगळणार?

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजच्या तिसऱ्या T 20 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

IND vs SA: आजच्या तिसऱ्या T 20 मॅचसाठी अशी असू शकते  Playing 11, पुण्याच्या मुलाला वगळणार?
Rahul dravid & Rishabh Pant Image Credit source: AFP
| Updated on: Jun 14, 2022 | 11:08 AM
Share

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजच्या तिसऱ्या T 20 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दिल्ला आणि कटक मध्ये दक्षिण आफ्रिकेने आरामात विजय मिळवला. आता विशाखापट्टनममध्ये टीम इंडिया (Team India) कमबॅक करणार का? हा प्रश्न आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला खेळात सुधारणा आणि काही बदल करण्याची आवश्यकता आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी (Batting & Bowling) दोन्ही आघाड्यांवर भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य नाहीय. दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम क्रिकेट खेळतोय. पुनरागमनासाठी भारतीय संघाला आपल्या खेळाचा स्तर उंचावावा लागेल. त्यासाठी भारतीय संघाला प्लेइंग 11 मध्ये काही बदल करावे लागतील.

दोन OUT, दोन IN

टीम इंडियात बदल निश्चित मानला जात आहे. ऋतुराज गायकवाड दोन सामन्यात प्रभाव पाडू शकलेला नाही. अक्षर पटेललाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या दोघांना बाहेर बसवलं जाऊ शकतं. आता प्रश्न हा आहे की, या दोघांना बाहेर बसवायचं, मग संधी कोणाला मिळणार?. अक्षर पटेलच्या जागी वेंकटेश अय्यरला संधी मिळू शकते. कारण फलंदाजी बरोबर तो गोलंदाजी करण्यासही सक्षम आहे. टीम इंडिया गोलंदाजी बळकट करण्यासाठी उमरान मलिकलाही संधी देऊ शकते. ओपनिंगला ऋतुराज गायकवाडच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळू शकते. तो सुद्धा गोलंदाजीचा एक चांगला पर्याय आहे.

तिसऱ्या टी 20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर/उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल,

कामगिरी उंचावावी लागेल

विशाखापट्टनम मध्ये जिंकण्यासाठी टीम इंडियाला दमदार खेळ दाखवावा लागेल. त्याशिवाय रणनितीमध्येही बदल करावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळत आहे. अशावेळी मध्यमगती गोलंदाजीची ताकत वाढवायची गरज आहे. भारतीय फलंदाजांनाही आपली कामगिरी उंचावावी लागेल.

Follow Us
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.