AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: आजच्या तिसऱ्या T 20 मॅचसाठी अशी असू शकते Playing 11, पुण्याच्या मुलाला वगळणार?

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजच्या तिसऱ्या T 20 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

IND vs SA: आजच्या तिसऱ्या T 20 मॅचसाठी अशी असू शकते  Playing 11, पुण्याच्या मुलाला वगळणार?
Rahul dravid & Rishabh Pant Image Credit source: AFP
| Updated on: Jun 14, 2022 | 11:08 AM
Share

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजच्या तिसऱ्या T 20 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. दिल्ला आणि कटक मध्ये दक्षिण आफ्रिकेने आरामात विजय मिळवला. आता विशाखापट्टनममध्ये टीम इंडिया (Team India) कमबॅक करणार का? हा प्रश्न आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला खेळात सुधारणा आणि काही बदल करण्याची आवश्यकता आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी (Batting & Bowling) दोन्ही आघाड्यांवर भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य नाहीय. दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम क्रिकेट खेळतोय. पुनरागमनासाठी भारतीय संघाला आपल्या खेळाचा स्तर उंचावावा लागेल. त्यासाठी भारतीय संघाला प्लेइंग 11 मध्ये काही बदल करावे लागतील.

दोन OUT, दोन IN

टीम इंडियात बदल निश्चित मानला जात आहे. ऋतुराज गायकवाड दोन सामन्यात प्रभाव पाडू शकलेला नाही. अक्षर पटेललाही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या दोघांना बाहेर बसवलं जाऊ शकतं. आता प्रश्न हा आहे की, या दोघांना बाहेर बसवायचं, मग संधी कोणाला मिळणार?. अक्षर पटेलच्या जागी वेंकटेश अय्यरला संधी मिळू शकते. कारण फलंदाजी बरोबर तो गोलंदाजी करण्यासही सक्षम आहे. टीम इंडिया गोलंदाजी बळकट करण्यासाठी उमरान मलिकलाही संधी देऊ शकते. ओपनिंगला ऋतुराज गायकवाडच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळू शकते. तो सुद्धा गोलंदाजीचा एक चांगला पर्याय आहे.

तिसऱ्या टी 20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर/उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि युजवेंद्र चहल,

कामगिरी उंचावावी लागेल

विशाखापट्टनम मध्ये जिंकण्यासाठी टीम इंडियाला दमदार खेळ दाखवावा लागेल. त्याशिवाय रणनितीमध्येही बदल करावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळत आहे. अशावेळी मध्यमगती गोलंदाजीची ताकत वाढवायची गरज आहे. भारतीय फलंदाजांनाही आपली कामगिरी उंचावावी लागेल.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत