AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: कुठे गेले 48 हजार कोटी? तुम्ही स्टेडियममधलं वास्तव बघा, VIDEO मधून BCCI ची पोलखोल

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज 2-2 अशी ड्रॉ झाली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला.

IND vs SA: कुठे गेले 48 हजार कोटी? तुम्ही स्टेडियममधलं वास्तव बघा, VIDEO मधून BCCI ची पोलखोल
Image Credit source: Screengrab
| Updated on: Jun 20, 2022 | 4:01 PM
Share

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची सीरीज 2-2 अशी ड्रॉ झाली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. बेंगळुरुमध्ये रविवारी पाऊस कोसळला. त्यामुळे फक्त 3.3 षटकांचा खेळ होऊ शकला. या पावसाने BCCI ची सुद्धा पोलखोल केली आहे. सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल केलं जातय. हजारोकोटींची कमाई करणाऱ्या बीसीसीआयच्या बेजबाबदारपणावर क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल मीडिया राइट्स विक्रीतून (IPL Media Rights) 48 हजार कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी सुद्धा बीसीसीआयने आय़पीएल आणि प्रसारण हक्कातून भरपूर पैसा कमावलाय. पण अजूनही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सुविधा मिळत नाहीत. तुटलेल्या खुर्च्या, छप्पर हे प्रश्न आजही कायम आहेत.

प्रेक्षकांची एकच पळापळ झाली

काल बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाचवा टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला. काल पाऊस सुरु झाला नव्हता, तो पर्यंत सर्व ठिक होतं. पण पाऊस सुरु होताच प्रेक्षकांची एकच पळापळ झाली. अनेक क्रिकेट रसिकांना आपलं आसन सोडावं लागलं. याचं कारण होतं, स्टेडियमचं गळकं छप्पर. अलीकडेच बीसीसीआयने 48 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेला आयपीएलचे मीडिया राइट्स विकले. स्टेडियममध्ये सुविधा उभारणी आणि सुधारणेसाठी या रक्कमेचा वापर केला जाईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. बंगळुरुच्या याच स्टेडियमवर आयपीएलचे सामने सुद्धा होतात. पण एकाच पावसाने स्टेडियममधील खराब सुविधांची पोल-खोल केली आहे.

बोर्डाची उडवली खिल्ली

एका युजरने बोर्डाची खिल्ली उडवताना बाहेर नैसर्गिक पाऊस आणि आतमध्ये पेड पाऊस सुरु असल्याचं म्हटलं होतं. या स्टेडियमवर सामने पाहण्यासाठी तिकीटाचे दर 5 ते 25 हजार रुपयापर्यंत आहेत, असं एका दुसऱ्या युजरने म्हटलं होतं. बोर्डाने प्रेक्षकांकडून पावसाचे पैसे वसूल केले आहेत, असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. काल सीरीजमधला शेवटचा सामना होता. मालिकेचा निकाल ठरवणारा सामना असल्यामुळे सगळ्यांनाच या मॅचची आतुरता होती. पण पावसाने पाणी फिरवलं.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...