IND vs SA: फायनल मॅचमध्ये पाऊस बनला ‘विलन’, भारतीय खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी

पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली.

IND vs SA: फायनल मॅचमध्ये पाऊस बनला 'विलन', भारतीय खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी
Ind vs SaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:38 PM

मुंबई: पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली. भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवण्याच्या ऋषभ पंतच्या (Rishabh pant) स्वप्नावर पावसाने पाणी फिरवलं. भारताला अजून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये मालिका विजय मिळवता आलेला नाही. टेंबा बावुमा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्याजागी केशव महाराजकडे (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व होतं. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ मैदानात उतरले होते. खेळ सुरु होणार इतक्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर पाऊस सुरु झाला. काही वेळाने पाऊस थांबला. त्यामुळे 50 मिनिट उशिराने सामना सुरु झाला. पावसामुळे खेळ 20 ऐवजी 19 षटकांचा करण्यात आला. इनिंग ब्रेकही 20 ऐवजी 10 मिनिटांचा करण्यात आला होता.

मालिकावीराचा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळाला

मॅच उशिराने सुरु झाली. भारताच्या डावात 3.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये जावे लागले. दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3.3 षटकात दोन बाद 28 धावा झाल्या होत्या. ऋषभ पंत एक रन्सवर होता, तर श्रेयस अय्यरने खात उघडलं नव्हतं. भारताकडून इशान किशन 15 आणि ऋतुराज गायकवाड 10 धावांवर बाद होऊन तंबूत परतला होता. भुवनेश्वर कुमारला मालिकावीराच्या पुररस्काराने सन्मानित करण्यात आलं.

दोन्ही संघांची संधी पावसाने हिरावली

भारताकडे पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची संधी होती. दक्षिण आफ्रिकेकडे भारतात टी 20 सीरीजमध्ये हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. पण पावासाने दोन्ही संघांकडून ही संधी हिरावून घेतली. दक्षिण आफ्रिकेने 2015 आणि 2019 मध्ये भारत दौऱ्यावर टी 20 सीरीज जिंकली होती. पण यावेळी सीरीज बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने पिछाडीवरुन कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली होती.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.