AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: फायनल मॅचमध्ये पाऊस बनला ‘विलन’, भारतीय खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी

पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली.

IND vs SA: फायनल मॅचमध्ये पाऊस बनला 'विलन', भारतीय खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी
Ind vs SaImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 19, 2022 | 10:38 PM
Share

मुंबई: पाचवा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याच भारताचं स्वप्न अखेर पूर्ण होऊ शकलं नाही. पावसाने भारताच्या मार्गात खोडा घातला. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) पाच सामन्यांची टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली. भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवण्याच्या ऋषभ पंतच्या (Rishabh pant) स्वप्नावर पावसाने पाणी फिरवलं. भारताला अजून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये मालिका विजय मिळवता आलेला नाही. टेंबा बावुमा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्याजागी केशव महाराजकडे (Keshav Maharaj) दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व होतं. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ मैदानात उतरले होते. खेळ सुरु होणार इतक्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर पाऊस सुरु झाला. काही वेळाने पाऊस थांबला. त्यामुळे 50 मिनिट उशिराने सामना सुरु झाला. पावसामुळे खेळ 20 ऐवजी 19 षटकांचा करण्यात आला. इनिंग ब्रेकही 20 ऐवजी 10 मिनिटांचा करण्यात आला होता.

मालिकावीराचा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळाला

मॅच उशिराने सुरु झाली. भारताच्या डावात 3.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा ड्रेसिंग रुममध्ये जावे लागले. दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 3.3 षटकात दोन बाद 28 धावा झाल्या होत्या. ऋषभ पंत एक रन्सवर होता, तर श्रेयस अय्यरने खात उघडलं नव्हतं. भारताकडून इशान किशन 15 आणि ऋतुराज गायकवाड 10 धावांवर बाद होऊन तंबूत परतला होता. भुवनेश्वर कुमारला मालिकावीराच्या पुररस्काराने सन्मानित करण्यात आलं.

दोन्ही संघांची संधी पावसाने हिरावली

भारताकडे पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची संधी होती. दक्षिण आफ्रिकेकडे भारतात टी 20 सीरीजमध्ये हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. पण पावासाने दोन्ही संघांकडून ही संधी हिरावून घेतली. दक्षिण आफ्रिकेने 2015 आणि 2019 मध्ये भारत दौऱ्यावर टी 20 सीरीज जिंकली होती. पण यावेळी सीरीज बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले, तर भारताने पिछाडीवरुन कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली होती.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.