AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टनशिपमध्ये मोठा बदल, हार्दिक पंड्या बनला व्हाइस कॅप्टन

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे.

IND vs SA: टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टनशिपमध्ये मोठा बदल, हार्दिक पंड्या बनला व्हाइस कॅप्टन
Team india Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 08, 2022 | 6:48 PM
Share

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला एक मोठा झटका बसला आहे. कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. राहुलच्या जागी आता विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. ऋषभ पंतला संघ निवड झाली, त्यावेळी उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. केएल राहुलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याला ग्रोइन इंजरी आहे. भारताला उद्यापासून सुरु होणाऱ्या मालिकेआधी दुहेरी झटका बसला आहे. कुलदीप यादवही दुखापतग्रस्त असून तो ही मालिकेत खेळू शकणार नाहीय. कुलदीप यादवला सरावादरम्यान दुखापत झाली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. भारताने या मालिकेसाठी आधीच सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघ या मालिकेत खेळतोय.

राहुलच नाही कुलदीप यादवही संघाबाहेर

भारतीय संघासमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कुलदीप यादवही चागंल्या फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2022 मध्ये कुलदीपने दमदार प्रदर्शन केलं होतं. राहुल आणि कुलदीपच्या जागी दुसऱ्या खेळाडूचं नाव जाहीर झालेलं नाही. राहुल आणि कुलदीपला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवलं जाईल. उद्या दोन्ही संघांमध्ये दिल्लीत पहिला सामना होईल.

भारत-दक्षिण आफ्रिकेत कोणाचं पारड जडं?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातला हा 16 वा सामना आहे. या आधी खेळल्या गेलेल्या 15 सामन्यात भारताचं पारड जड आहे. भारताने 9 सामने जिंकलेत, तर दक्षिण आफ्रिकेने सहा. दक्षिण आफ्रिकन संघासाठी एक चांगली बाब आहे, ती म्हणजे भारतीय मैदानांवर त्यांची कामगिरी चांगली आहे. भारतात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ 4 सामने खेळलाय. त्यात 3 सामने त्यांनी जिंकलेत. भारतात टीम इंडियाला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा