AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 3rd T20: Rohit Sharma ने टॉस जिंकला, टीम इंडियात आज तीन बदल

IND vs SA 3rd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 साठी अशी आहे प्लेइंग -11

IND vs SA 3rd T20: Rohit Sharma ने टॉस जिंकला, टीम इंडियात आज तीन बदल
Team india
| Updated on: Oct 04, 2022 | 6:48 PM
Share

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज टी 20 सीरीजमधला शेवटचा सामना होणार आहे. इंदूरमध्ये ही मॅच होणार आहे. टीम इंडियाने तिरुअनंतपूरम आणि गुवाहाटीमध्ये झालेला सामना जिंकला. टीम इंडियाने सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आज टीम इंडिया क्लीन स्वीपच्या इराद्याने मैदानात उतरेल.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आलाय.

अर्शदीप सिंहला पाठिच्या दुखण्याचा त्रास होतोय. पण ही दुखापत गंभीर नाहीय. जसप्रीत बुमराहला पाठिच्या दुखण्याचा त्रास आहे. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर गेलाय. त्याच्याजागी मोहम्मद सिराज मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे.

सिराजसाठी आजचा सामना एका चाचणी सारखा आहे. त्यामुळे थोडफार चित्र स्पष्ट होईल. विराट कोहली आणि केएल राहुलला वर्ल्ड कपआधी मिनी ब्रेक देण्यात आला आहे.

अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चाहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.