AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL फायनल सामन्याआधी पावसाबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ आला समोर!

Ind vs ban Asia cup final : भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये पावसाचं संकट आहे. पावसाने खोडा घातला तरी एक दिवस राखीव आहे. त्याआधी आजचं कोलंबोमधील वातावरण कसं ते पाहून घ्या>

IND vs SL फायनल सामन्याआधी पावसाबाबत मोठी अपडेट समोर, व्हिडीओ आला समोर!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 17, 2023 | 11:51 AM
Share

मुंबई :  आशिया कप 2023  मध्ये भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत. आज म्हणजेच रविवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सामन्याला सुरूवात होणारआहे. आशिया कपच्या फायनल सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलेलं असणार आहे. आतापर्यंत पावसाने आशिया कपमधील अनेक सामन्यांमध्ये खोडा घातला आहे. या सामन्यावर पावसाचं संकट असणार असून हा पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सामन्याच्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणा आहे. त्यामुळे सामन्यात केव्हाही पाऊस खोडा घालू शकतो. अंदाजानुसार, संध्याकाळी पावसाची 90 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच सामन्याआधी 1 ते 2 या वेळेत वादळाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र गेले दोन दिवसही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला मात्र पाऊस काही झाला नाही.

पाहा व्हिडीओ-

हवामानामध्ये अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे आता आभाळ मोकळं असलं तरी वातावरणामध्ये कधीही होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वा चाहते आज पाऊस पडायला नको अशी प्रार्थना करत असतील. जरी पाऊस आला तरी काही काळजी करण्याचं कारण नाही. आजचा सामना रद्द झाला तरी उद्या म्हणेजच 18 सप्टेबर हा दिवस राखून ठेवला आहे. मात्र आजचा सनडेला फुल अँड फायनल काय तो निकाल लागायला हवा.

 पावसाने सामना रद्द झाला तर…

जर पावसाने आजही एन्ट्री केली आणि उद्याचा राखीव दिवस ठेवला आहे. पण जर राखीव दिवशीसुद्धा पावसाने आगमन केलं तर आशिया कप फालनलची ट्रॉफी कोणाच्या पदरात पडणार असा सवाल चाहत्यांना पडला आहे. जर दुसऱ्याही दिवशी पावसाचं आगमन झालं आणि सामना रद्द झाला तप भारत आणि श्रीलंका दोघांना विजेतेपद वाटून देण्यात येणार आहे. याआधी चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंकेमध्ये विजेतेपद वाटून देण्यात आलं होतं.

दरम्यान, आजचा फायनल सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडिअममध्ये दुपारी तीन वाजता होणार आहे.  या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. रोहित अँड कंपनीला आठव्यांदा आशिया कपची ट्रॉफी भारताच्या नावावर करण्याची नामी संधी आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय