AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पुन्हा येणार भारत पाकिस्तान आमनेसामने, पण कधी आणि केव्हा? ते जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते. हा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे भारताने सहज विजय मिळवला. दुसरीकडे, पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण हे दोन संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. कधी आणि केव्हा ते जाणून घ्या

IND vs PAK : पुन्हा येणार भारत पाकिस्तान आमनेसामने, पण कधी आणि केव्हा? ते जाणून घ्या
| Updated on: Feb 25, 2025 | 3:23 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतच भारताने पाकिस्तानचा वचपा काढला. 2017 च्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत केलं होतं. त्याचा वचपा काढत भारताने पाकिस्तानला साखळी फेरीतूनच आऊट केलं आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हा सामना पुन्हा पाहण्याची संधी या स्पर्धेत तरी येणार नाही. मग हे दोन संघ आता कधी आमनेसामने येतील असा प्रश्न आहे. तर हे दोन संघ आता आशिया कप स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतील. आशिया कप स्पर्धा 2025 या वर्षाच्या शेवटी सुरु होईल आणि 2026 च्या सुरुवातीला संपेल. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येतील. 2026 टी20 वर्ल्डकपपूर्वी या स्पर्धेचं प्रारुप हे टी20 फॉर्मेटमध्ये असेल. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि युएई हे संघ आहेत.

आशिया कप 2025-26 ही स्पर्धा दोन गटात विभागली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ साखळी फेरीत दोन सामने खेळेल. प्रत्येक गटात दोन संघ अव्वल असतील त्याने पुढची संधी मिळेल. त्यानंतर अव्वल चार सुपर 4 फेरीत जागा मिळवतील. अ गटात भारत, पाकिस्तान आणि युएई, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश हे संघ असतील. यामुळे या टप्प्यातही भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येतील. सुपर 4 मधील अव्वल दोन संघ अंतिम फेरी गाठतील. त्यामुळे अंतिम फेरीतही भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे या वर्षाअखेरीस क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान असे तीन सामने पाहण्याची संधी मिळू शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकिर्दिची शेवटची स्पर्धा असू शकते. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ आता वनडे कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर टाकेल याबाबत चर्चा सुरु आहे. पण अजूनतरी याबाबत काही स्पष्ट नाही. पण रोहित शर्माचं वय आणि 2027 वनडे वर्ल्डकपची तयारी पाहता ही संधी दुसऱ्या खेळाडूला मिळणार यात काही शंका नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.