AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI ने पेटारा उघडला, कसोटी खेळणाऱ्या खेळांडूवर पैशांचा पाऊस, जय शाह यांची मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाचव्या कसोटी सामन्यामध्ये रोहित अँड कंपनीने इंग्लिश संघाला 4-1 ने धूळ चारली. पाचव्या सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. नेमके किती पैसे मिळणार जाणून घ्या.

BCCI ने पेटारा उघडला, कसोटी खेळणाऱ्या खेळांडूवर पैशांचा पाऊस, जय शाह यांची मोठी घोषणा
| Updated on: Mar 09, 2024 | 5:10 PM
Share

मुंबई : टीम इंडियाने इंग्लंड संघाला पाचव्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामधील विजय हा ऐतिहासिक ठरला आहे. इग्लंड संघाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत कडक सुरूवात केली होती. मात्र टीम इंडियाने चारही सामन्यात मुसंडी मारत इंग्लंड संघाला चारीमुंड्या चीत केलं. टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयनेही आपला पिटारा उघडला आहे. बीसीसीसआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे.

कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना आता सामन्याच्या मानधनाशिवाय आणखी पैसे मिळणार आहेत. जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.  कसोटी क्रिकेटकडे खेळाडू आता कानाडोळा करू लागल्याने बीसीसीआयनेही अशा प्रकारे डोकं लावलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याचे प्रत्येक खेळाडूला 15 लाख इतकं मानधन मिळतं. पण आता है पैसे तर मिळणारच आहेत. पण बोनसप्रमाणे आणखी काही एक ठराविर रक्कम खेळाडूंना मिळणार आहे. नेमके किती पैसे आणि कोणत्या खेळाडूंना मिळणार जाणून घ्या.

खेळाडूंना मिळणार किती पैसे?

एका खेळाडूने एका सीझनमध्ये 75 टक्के (7 किंवा त्याहून अधिक) कसोटी सामने खेळले तर त्याला प्रत्येक सामन्याचे 45 लाख रुपये मिळणार आहेत. 50 टक्के म्हणजे (5 किंवा 6 अधिक) कसोटी खेळणाऱ्यांना प्रति सामना 30 लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेइंग 11 चा भाग नसतीला त्यांना 15 कोटी एका सामन्याचे मिळणार आहेत. जर एखाद्या खेळाडूने एकी सीझनमध्ये 9 कसोटी सामने असतील त्यातील चारही सामने खेळले नसतील तर त्यांना कोणतंही जास्तीचं मानधन मिळणार आहे.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील वार्षिक केंद्रीय करारामधून दोन खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आलं. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर अशी दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. बीसीसीआयने दणका दिल्यावर अय्यर रणजीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी तयार झाला. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता खेळाडूंच्या माणसिकतेमध्ये काही बदल होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.