AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलामीच्या सामन्यात दमदार अर्धशतक, स्थानिक क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा, तरीही 10 सामन्यात कारकीर्द संपुष्टात

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या खेळाडूने 10 हजाराहून अधिक धावा केल्या. तसेच आयपीएलमध्येही उत्तम फलंदाजी केली. पण या सर्वानंतरही भारताकडून मात्र तो केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.

सलामीच्या सामन्यात दमदार अर्धशतक, स्थानिक क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा, तरीही 10 सामन्यात कारकीर्द संपुष्टात
सुब्रमण्यम बद्रीनाथ
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 11:41 AM
Share

चेन्नई : भारतीय संघातील एका अशा माजी खेळाडूचा आज वाढदिवस आहे, जो आपल्या विश्वासून फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. पण भारतीय संघातून अवघे हातावर मोजण्याइतकेच सामने खेळू शकला. संघा अनेक दिग्गज खेळाडू  असल्याने त्याची  क्रिकेट कारकीर्द अधिक काळाची होऊ शकली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या या खेळाडूने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती. पण तरी भारताकडून खेळताना त्याला फार कमी संधी मिळाली. या क्रिकेटपटूचे नाव सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramaniam Badrinath) आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघातील महत्त्वाचा फलंदाज खेळणारा बद्रीनाथ भारतासाठी दोन कसोटी सामन्यांसह केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.

बद्रीनाथने भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात सामने खेळले. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं. तर एकदिवसीय सामन्यात विजयी खेळी खेळली. तर टी-20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला.  बद्रीनाथने प्रथन श्रेणी क्रिकेटमध्ये 145 सामन्यात 54.49 च्या सरासरीने 10 हजार 245 धावा केल्या ज्यामध्ये 32 शतकं ठोकली. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 144 सामन्यात 36.84 च्या सरासरीने 4 हजार 164 धावा केल्या. याशिवाय स्थानिक 142 टी-20 सामन्यात 2 हजार 300 धावा बनवल्या. भारताकडून मात्र सात एकदिवसीय सामन्यात केवळ 79 धावाच बद्रीनाथ करु शकला. 2011 मध्ये तो अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.

सलामीच्या टी20 सामन्यात सामनावीर, तरीही पुन्हा संधी नाही

बद्रीनाथने 2010 मध्ये दक्षिण आफ्रीका विरुद्धच्या कसोटी मालिकेत डेब्यू केला. पहिल्या सामन्यातच त्याने 56 धावा करत अर्धशतक ठोकलं. पण त्यानंतर तो केवळ एकच कसोटी सामना खेळला. तर 2011 मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध त्याने टी-20 डेब्यू केला. या सामन्यात 43 महत्त्वाच्या धावा करत त्याने सामनावीराचा पुरस्कार मिळवला. पण त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. तो फलंदाजीसह गोलंदाजीही करत असता तर त्याला आणखी संधी मिळाली असती असं म्हटलं जातं.

हे ही वाचा :

भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूचा तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतला संन्यास

रहाणे, पुजारा, ईशांतला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती? 3 नव्या खेळाडूंची नावं चर्चेत, प्लेईंग इलेव्हन बदलणार

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

(Indian Cricketer subramaniam badrinath birthday on this day who retired very early)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?