AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 Final : भारताचं अंतिम फेरीचं भविष्य पाकिस्तान संघाच्या हाती, जाणून घ्या जर तरचं गणित

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी बॉक्सिंग डे कसोटी सामने खूपच महत्वाचे आहेत. त्यामुळे भारताची नजर पाकिस्तानच्या कामगिरीकडे असेल. भारत-ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान-दक्षिण अफ्रिका यांच्यात सामने होणार आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानकडून कशी मदत होऊ शकते ते जाणून घ्या.

WTC 2025 Final : भारताचं अंतिम फेरीचं भविष्य पाकिस्तान संघाच्या हाती, जाणून घ्या जर तरचं गणित
| Updated on: Dec 25, 2024 | 6:08 PM
Share

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते कायम एकमेकांना डिवचतात. काहीही झालं तर कसं वाईट होईल याची वाट पाहात असतात. सध्या भारतीय संघ एका वेगळ्याच वळणावर उभा ठाकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठीसाठी सर्वच शक्यताची चाचपणी करावी लागत आहे. अशात पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. पण या दोन्ही सामन्यात विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण भारताने पहिल्या सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत नाजूक स्थिती झाली. दुसरा कसोटी सामना गमावला तर तिसरा सामना ड्रॉ झाला. भारताने एखादा सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर सर्वच चित्र बिघडून जाईल. अशा परिस्थितीत भारताला पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. नेमकं गणित कसं आहे ते समजून घ्या.

सध्या दक्षिण अफ्रिकेचा संघ 63.33 टक्के गुणांसह आघाडीवर आहे. त्यामुळे एका सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीतील त्यांचं स्थान पक्कं होणार आहे. त्यामुळे भारताला काहीही करून गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. दरम्यान, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामने होणार आहे. पाकिस्तानने टी20 आणि वनडे सारखी कामगिरी केली आणि कसोटीत 2-0 ने पराभूत केल्यास भारताला अंतिम फेरीत खेळण्याची शक्यता वाढणार आहे.

भारताने 2-1 ने जिंकली तर पाकिस्तान संघाने किमान दक्षिण आफ्रिकेला 1-0 ने हरवले पाहिजे. तसेच, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियन संघाचा 1-0 असा पराभव केला पाहिजे. जर टीम इंडियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली तर विजयी टक्केवारी गुण 55.26 होईल. अशा परिस्थितीत भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकणे आवश्यक आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली तर भारताचे 53.51 टक्के गुण होतील. अशा स्थितीत पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत करणं आवश्यक आहे. दुसरीकडे, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडतील. मग पाकिस्तानचा 2-0 असा विजयाचा फारसा उपयोग होणार नाही.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा