AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Shreyas iyer ला KKR च्या कॅप्टनशिपवरुन हटवणार?, थेट CEO चं नाव घेतलं

IPL 2022: कोलकाताच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकात 113 धावात आटोपला. 52 धावांनी मोठा विजय मिळवून केकेआरने आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

IPL 2022: Shreyas iyer ला KKR च्या कॅप्टनशिपवरुन हटवणार?, थेट CEO चं नाव घेतलं
KKR Captain Shreyas iyer Image Credit source: twitter
| Updated on: May 10, 2022 | 12:06 PM
Share

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर काल कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (KKR vs MI) सामना झाला. कोलकातासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्यासाठी कोलकाताला या सामन्यात विजय आवश्यक होता. मुंबई इंडियन्सकडून काल जसप्रीत बुमराहने (Jasprit bumrah) भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. त्याने चार षटकात 10 धावा देत 5 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीनेच कोलकाताला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 165 धावांवर रोखलं. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामना जिंकेल, असं वाटत होतं. पण केकेआरच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. या सीजनमध्ये कोलकाताकडून मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्यांदा पराभूत झाला.

श्रेयस जे बोलून गेला, ते धक्कादायक

कोलकाताच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकात 113 धावात आटोपला. 52 धावांनी मोठा विजय मिळवून केकेआरने आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सामना संपल्यानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरला खेळाडूंना वगळण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने धक्कादायक खुलासा केला. सामन्याआधी होणाऱ्या टीम मीटिंगमधली मोठी गोष्ट त्याने उघड केली. खरंतर श्रेयस जे बोलून गेला, ते धक्कादायक आहे. केकेआरच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे ते संकेत आहेत.

वेंकी मैसूर यांचं काम काय?

संघाच्या निवड प्रक्रियेत टीमचे CEO वेंकी मैसूर सहभागी असतात, असं त्याने सांगितलं. “संघातून तुम्हाला वगळण्यात येतय, हे खेळाडूंना सांगण खूप कठीण असतं. टीमचे कोच आणि CEO सुद्धा संघ निवडीमध्ये सहभागी असतात. प्रत्येक खेळाडूने हा निर्णय योग्य प्रकारे स्वीकारला. प्रत्येक खेळाडूने मैदानात सर्वोत्तम प्रयत्न केले” असं श्रेयस म्हणाला.

श्रेयसने टीम मॅनेजमेंटशी पंगा तर घेतला नाही ना?

टीम निवडीमध्ये कोचचा रोल महत्त्वाच असतो. पण CEO चं काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आतली गोष्ट बाहेर सांगून, श्रेयसने टीम मॅनेजमेंटशी पंगा तर घेतला नाही ना? अशी चर्चा दबाक्या आवाजात सुरु झाली आहे. श्रेयसला या सीजननंतर कॅप्टनशिपवरुन हटवणार, असे टि्वटस काही युजर्सनी केले आहेत. यंदाच्या सीजनमध्ये केकेआरची कामगिरी विशेष राहिलेली नाही. गुणतालिकेत केकेआरची टीम सातव्या स्थानावर आहे. 12 सामन्यात त्यांनी पाच विजय मिळवले आहेत. केकेआरने त्यांचे उर्वरित 2 सामने जिंकले, तरी प्लेऑफसाठी त्यांनी इतर संघांच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागणार आहे. केकेआरचे 10 पॉइंटस झाले आहेत. मेगा ऑक्शनमध्ये KKR ने 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजून श्रेयस अय्यरला विकत घेतलं होतं.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष