AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचं ट्वीट, म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा एक मोठा फॅनबेस आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरल्यानंतर संघाकडून बऱ्याच अपेक्षा चाहत्यांना असतात. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

IPL 2024 : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचं ट्वीट, म्हणाला...
IPL 2024 : तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आला पुढे, ट्वीट करत सांगितलं की...
| Updated on: Apr 02, 2024 | 4:07 PM
Share

आयपीएल स्पर्धेत पहिल्या पर्वानंतर 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले आहेत. रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. तिसरा पराभव तर होमग्राउंड असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी रोष व्यक्त केला आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी आणि 27 चेंडू राखून पराभव केला. इतकंच काय तर या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला हुटिंगही सहन करावी लागत आहे. नाणेफेकीवेळी संजय मांजरेकरने चाहत्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं होतं. तर सामन्यादरम्यान रोहित शर्माही चाहत्यांना इशाऱ्यातून समजवण्याचा प्रयत्न करत होता. आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने ट्विटरवर आपलं म्हणणं मांडलं आहे आणि टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

हार्दिक पांड्याने ट्विटरवर लिहिलं आहे की, “एक गोष्ट अशी आहे की, तुम्हाला या टीमबाबत माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे आम्ही कधी हार पत्कारत नाहीत. आम्ही लढत राहू आणि पुढे जात राहू.” मुंबई इंडियन्स संघ फलंदाजी आणि गोलंदाजीतही सुमार ठरत आहे. दोन्ही पातळीवर संघाची पिछेहात होताना दिसत आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत 7 एप्रिलला होणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात उर्वरित 11 सामन्यात मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करते याची उत्सुकता आहे. चौथ्या सामन्यातही पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र स्पर्धेतील आव्हान आणखी खडतर होत जाईल. जशी स्पर्धा पुढे जाईल तसं इतर संघांवर अवलंबून राहण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे पुढच्या 11 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला आणखी मेहनत घ्यावी लागेल. दुसरीकडे, वानखेडे सलग तीन सामने होणार आहेत. त्यामुळे नाणेफेकही महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.