AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. हा सामना कधी या पारड्यात तर कधी त्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटी गुजरात टायटन्स सरस ठरला आणि 7 विकेट्सने विजय मिळवला.

GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना
शुबमन गिल आणि अक्षर पटेलImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 19, 2025 | 9:28 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच 200 पार धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सने आरसीबीविरुद्द 198 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. विशेष म्हणजे गुजरात टायटन्सने मोठ्या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकातच टार्गेट गाठलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.हे आव्हान गुजरात टायटन्सने 3 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं. खरं तर एक क्षण असा होता की सामना दिल्ली कॅपिटल्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण जोस बटलरने सामना खेचून आणला. या सामन्यानंतर पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आपलं मत मांडलं आहे. अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या. आम्ही वेग वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही विकेट गमावत राहिलो. आम्हाला हव्या त्या पद्धतीने खेळ संपवता आला नाही. आम्ही चांगली गोलंदाजी केली. जर आम्ही आणखी काही संधी निर्माण केल्या असत्या तर परिस्थिती जवळ आली असती. ही काही फटक्यांची बाब होती. या पराभवाबद्दल आम्ही जास्त विचार करणार नाही.’

विजयानंतर शुबमन गिलनेही आपलं मत मांडत म्हणाला की, ‘एकेकाळी असे वाटत होते की एकूण धावसंख्या 220-230 होईल. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना खाली खेचलं त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. पहिल्या सामन्यातही 245 धावांचा पाठलाग करताना आम्ही खेळात बरोबर होतो, फक्त 10 धावांनी हरलो. आम्ही चांगला पाठलाग करत आहोत, आम्ही चांगला बचाव करत आहोत.’

‘अक्षरच्या फलंदाजीमुळे ते सामन्यात पुढे होते. वेगवान गोलंदाजांना फटका मारणे कठीण होते, म्हणून आम्हाला वाटले की आम्ही त्यांच्यासोबत खेळत राहू. रन आऊट होणं होण्याची निराशाजनक असतं. परंतु आमच्याकडे येथे बरेच सामने आहेत आणि आशा आहे की मला संधी मिळेल. बटलर आणि रदरफोर्डने ज्या पद्धतीने स्ट्राइक रोटेट केले आणि त्यांनी मारलेले फटके जबरदस्त होते. त्यांनी खूप विचारपूर्वक फलंदाजी होती, ती पाहणे एक आनंदाची गोष्ट होती. हा विजय मिळवून खूप आनंद झाला.’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.