AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. हा सामना कधी या पारड्यात तर कधी त्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटी गुजरात टायटन्स सरस ठरला आणि 7 विकेट्सने विजय मिळवला.

GT vs DC : अक्षरने दिल्लीच्या पराभवासाठी कोणाला धरलं दोषी? तर गिलने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना
शुबमन गिल आणि अक्षर पटेलImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 19, 2025 | 9:28 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच 200 पार धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सने आरसीबीविरुद्द 198 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. विशेष म्हणजे गुजरात टायटन्सने मोठ्या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकातच टार्गेट गाठलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.हे आव्हान गुजरात टायटन्सने 3 गडी गमवून 19.2 षटकात पूर्ण केलं. खरं तर एक क्षण असा होता की सामना दिल्ली कॅपिटल्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण जोस बटलरने सामना खेचून आणला. या सामन्यानंतर पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने आपलं मत मांडलं आहे. अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या. आम्ही वेग वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही विकेट गमावत राहिलो. आम्हाला हव्या त्या पद्धतीने खेळ संपवता आला नाही. आम्ही चांगली गोलंदाजी केली. जर आम्ही आणखी काही संधी निर्माण केल्या असत्या तर परिस्थिती जवळ आली असती. ही काही फटक्यांची बाब होती. या पराभवाबद्दल आम्ही जास्त विचार करणार नाही.’

विजयानंतर शुबमन गिलनेही आपलं मत मांडत म्हणाला की, ‘एकेकाळी असे वाटत होते की एकूण धावसंख्या 220-230 होईल. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना खाली खेचलं त्याचे श्रेय गोलंदाजांना जाते. पहिल्या सामन्यातही 245 धावांचा पाठलाग करताना आम्ही खेळात बरोबर होतो, फक्त 10 धावांनी हरलो. आम्ही चांगला पाठलाग करत आहोत, आम्ही चांगला बचाव करत आहोत.’

‘अक्षरच्या फलंदाजीमुळे ते सामन्यात पुढे होते. वेगवान गोलंदाजांना फटका मारणे कठीण होते, म्हणून आम्हाला वाटले की आम्ही त्यांच्यासोबत खेळत राहू. रन आऊट होणं होण्याची निराशाजनक असतं. परंतु आमच्याकडे येथे बरेच सामने आहेत आणि आशा आहे की मला संधी मिळेल. बटलर आणि रदरफोर्डने ज्या पद्धतीने स्ट्राइक रोटेट केले आणि त्यांनी मारलेले फटके जबरदस्त होते. त्यांनी खूप विचारपूर्वक फलंदाजी होती, ती पाहणे एक आनंदाची गोष्ट होती. हा विजय मिळवून खूप आनंद झाला.’, असं शुबमन गिल पुढे म्हणाला.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.