AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार हार्दिक पांड्याने असं फोडलं खापर

आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. हा सामना गुजरात टायटन्सने डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेट राखून जिंकला. खरं तर हा सामना मुंबईच्या हातात होतं असं दिसत होतं. पण हार्दिक पांड्याने या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं.

मुंबई इंडियन्सने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार हार्दिक पांड्याने असं फोडलं खापर
हार्दिक पांड्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2025 | 1:13 AM
Share

आयपीएल २०२५ स्पर्धेत प्लेऑफची शर्यत अंतिम टप्प्यात आली असताना मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. खरं तर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना डकवर्थ लुईस नियमानुसार करावा लागला. या सामन्यात एका षटकात १५ धावांचं टार्गेट देण्यात आलं होतं. शेवटचं षटक टाकण्यासाठी दीपक चहरच्या हाती चेंडू सोपवला होता. पहिल्याच चेंडूवर तेवतियाने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत कोएत्झीला स्ट्राईक दिला. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडू टाकला आणि एक धाव आली, पण हा नो बॉल असल्याची पंचांनी सांगितलं. त्यामुळे तीन चेंडूत २ धावा अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर तेवतियाने एक धाव घेतली आणि धावसंख्या बरोबरीत आली. पाचव्या चेंडूवर कोएत्झी उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला. एक चेंडू एक धाव अशी स्थिती असताना अर्शद खान स्ट्राईकला आला आणि एक धाव घेतली. खरं तर या चेंडूवर रनआऊट झाला असता पण हार्दिक डायरेक्ट हीट मारण्याच्या नादात फसला आणि सामना गमावला. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘मला वाटतं आम्ही खूप चांगली लढाई केली. आम्ही एक संघ म्हणून प्रयत्न करत राहिलो. मला वाटतं ते १५० धावांची खेळपट्टी नव्हती. पण आम्ही २५ धावांनी कमी पडलो होतो. गोलंदाजांना श्रेय द्यावे लागेल. कारण ते संपूर्ण सामन्यात लढत राहिले. सोडलेले झेल तुम्हाला त्रास देतात, पण झेल आम्हाला फारसे त्रास देत नव्हते. मुलांनी मैदानात त्यांचे १२० टक्के योगदान दिले आणि हार मानली नाही याबद्दल खरोखर आनंदी आहोत. पहिल्या डावात मैदान ओले नव्हते, परंतु दुसऱ्या डावात पाऊस येत राहिल्याने आमच्यासाठी ते कठीण होते. आम्हाला खेळ खेळावा लागला आणि आम्ही ते केले.’

गुजरात टायटन्सला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या गेराल्ड कोएत्झीने सांगितलं की, ‘मला वाटले की तो यॉर्कर्ससाठी जाईल, त्या बाउन्सरने मला आश्चर्यचकित केले, मी फक्त यॉर्कर्सबद्दल विचार करत होतो. कदाचित माझ्यात सेलिब्रेशनच्या वेळी आफ्रिकन असेल. संघातील वातावरण खूप चांगले आहे, खूप आरामशीर आहे, ते जमिनीवर स्पष्ट दिसते, परंतु नियोजन चांगले आहे आणि संघातील वातावरण खूप चांगले आहे.’

कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.