
हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात विजयी सुरुवात केली आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 5 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. मुंबईने अशाप्रकारे आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. तर केकेआर अपयशी ठरली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन ही जोडी मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही योगदान दिलं.