फक्त 1 रन आणि वादाला फोडणी..! आयपीएलच्या या नियमावर आर अश्विनने ठेवलं बोट, पंजाब झालं नुकसान
आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत सुरू आहे. या सामन्यात ऑन फिल्ड पंचांच्या निर्णयामुळे पंजाब किंग्सचं नुकसान झालं. त्यामुळे आर अश्विनने आयपीएलच्या नियमावर बोट ठेवत बदलण्याची मागणी केली.

R Ashwin On DRS reversal: आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात पंजाब किंग्सने 20 षटकात 8 गडी गमवून 200 धावा केल्या. तसेच मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं. असं असताना आर अश्विनने या सामन्यात पंजाब किंग्सचं एका धावेचं नुकसान संताप व्यक्त केला आहे. तसेच आयपीएलमधील एका वादग्रस्त नियमाकडे लक्ष वेधलं आहे. आर अश्विनच्या मते, आयसीसीने हा नियम बदलावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेत हा नियम बदलण्याची गरज आहे. पंजाब किंग्सच्या डावाच्या 20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा प्रकार घडला. जसप्रीत बुमराह शेवटचं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील झाली आणि पंचांनी बाद दिलं. पण रिव्ह्यू घेतल्यानंतर एका धावेचं नुकसान झालं.
जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता विष्णु विनोद स्ट्राईकला होता आणि फटका मारताना चुकला. त्या पॅडवर चेंडू आदळला आणि बुमराहने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. पण त्यानंतर पंजाब किंग्सने रिव्ह्यू घेतला आणि डीआरएसच्या बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू इम्पॅक्ट ऑफ स्टम्पच्या बाहेर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पंचांनी विष्णु विनोद नाबाद असल्याचं सांगितलं. या दरम्यान, विष्णु विनोदने एक धाव घेतली होती. पण धाव घेण्यापूर्वीच ऑन फिल्ड पंचांनी त्याला बाद दिलं होतं. त्यामुळे चेंडू डेड ढाला होता. त्यामुळे निर्णय बदलल्यानंतरही पंजाब किंग्सला एक धाव मिळाली नाही. यानंतर माजी फिरकीपटू आर अश्विनने टीकास्त्र सोडत सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
The wrong decision has cost Punjab a run, this rule needs to change ASAP!
Just like how the “IMPACT SUB” is an IPL rule, the DRS reversal should also be brought into the IPL even if the ICC delays it for some reason. #MIVPBKS #IPL
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) May 14, 2026
आर अश्विनने लिहिलं की, ‘चुकीच्या निर्णयामुळे पंजाब किंग्सच्या एका धावेचं नुकसान झालं. हा नियम लगेच बदलला पाहीजे. जसं की इम्पॅक्ट सब हा आयपीएलचा नियम आहे. तसंच डीआरस रिव्हर्सलवरही आयपीएमध्ये बदल केला पाहीजे. भले आयसीसीने हा नियम बदलण्यास विलंब केला तरी…’ आर अश्विनचं हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. कारण एक धाव किती महत्त्वाची आहे हे अनेक सामन्यात दिसून आलं आहे. एका धावेमुळे सुपर ओव्हरमध्ये सामना जाण्याची किंवा गमवण्याची वेळ येऊ शकते.