AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND | तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल! अशी असेल प्लेईंग इलेव्हन

Ireland vs India 3rd T20I | आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.

IRE vs IND | तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल! अशी असेल प्लेईंग इलेव्हन
| Updated on: Aug 22, 2023 | 8:55 PM
Share

डब्लिन | टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धची 3 सामन्यांची मालिका ही 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 23 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया तिसरा सामना जिंकून आयर्लंडला क्लिन स्वीप देण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला आयर्लंड मोठा उलटफेर करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. टीम इंडियाने मालिका जिंकल्याने तिसऱ्या मॅचमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. त्यानुसार विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला विश्रांती दिली जाऊ शकते. तर त्याच्या जागी अमरावतीकर जितेश शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

टीममध्ये मोठे बदल

तिसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन जसप्रीत बुमराह प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. बुमराह पहिल्या 2 सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला विश्रांती दिली जाऊ शकते. तर संजू सॅमसन याची जागा विकेटकीपर जितेश शर्मा घेऊ शकतो. तर युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आवेश खान यांनाही संधी दिली जाऊ शकते.

टीम इंडियाने आतापर्यंत मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात झक्कास कामगिरी केलीय. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने धारदार बॉलिंगने सर्वांचंच लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं. मात्र सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना डकवर्थ लुईसनुसार 2 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाका केला. पहिल्या सामन्यात पावसामुळे सलामी जोडीशिवाय एकालाही संधी मिळाली नव्हती. मात्र त्याची भरपाई टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात केली.

दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने अर्धशतक ठोकलं होतं. तर शिवम दुबे आणि रिंकू सिंह या जोडीने जोरदार फटकेबाजी करत फिनिशिंग टच दिला. पहिल्यांदाच बॅटिंग करणाऱ्या रिंकूने 21 बॉलमध्ये 38 धावा केल्या. तर कॅप्टन जसप्रीत बुमराह याने बॉलिंग करताना 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई यानेही आपली छाप सोडली.

आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग इलेव्हन | यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, जितेश शर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंह आणि रवि बिश्नोई.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.