AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya, Yuzvendra Chahal :’हार्दिकमुळे थंडी जास्त, 3 स्वेटरही काम करेना’, जाणून घ्या चहल असं का म्हणाला?

युझवेंद्र चहल हा विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात त्याने केवळ एक विकेट घेतली. त्याच्या तरबेज गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. विजयानंतर चहलने अजब विधान केलं.

Hardik Pandya, Yuzvendra Chahal :'हार्दिकमुळे थंडी जास्त, 3 स्वेटरही काम करेना', जाणून घ्या चहल असं का म्हणाला?
Hardik PandYa, Yuzvendra ChahalImage Credit source: social
| Updated on: Jun 27, 2022 | 10:02 AM
Share

नवी दिल्ली : भारतानं (IND) काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. टी-20 (T-20) T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण विजयानं झालं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सहज पराभव केला. पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने विजयासाठी 9 षटकांत 109 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. लेगस्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात त्याने केवळ एक विकेट घेतली. त्याच्या तरबेज गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. विजयानंतर चहलने अजब विधान केलं. त्यांचे विधान आयर्लंडच्या थंडीबाबत होतं. मात्र, आता त्याचाही थेट संबंध हार्दिकशी जोडला गेलाय. यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. त्या थंडीचा हार्दिकशी काय संबंध जाणून घ्या…

हार्दिकची कॅप्टनसी कूल

चहलने हार्दिकच्या कॅप्टन्सीबाबत एक मजेशीर विधान केलंय. तो म्हणाला की, ‘हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाचं वातावरण एकदम मस्त आहे. तो मला आणि इतर खेळाडूंना त्याची आयडीया उघडपणे अंमलात आणण्याचं स्वातंत्र्य देतोय. त्यामुळे संघाचं तापमानही घसरलंय आणि तीन स्वेटर घालूनही मला माझे काम करता येत नाही.’ असं चहलनं म्हटलंय.

हवामान इतकं थंड…

युझवेंद्र चहलनं आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 3 षटकात 11 धावा देत 1 बळी घेतला. त्याचा इकॉनॉमी रेट 3.66 होता. बाकीच्या भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत खूपच कमी होता. सामन्यानंतर चहल म्हणाला, ‘आयर्लंडमधील हवामान इतके थंड आहे की येथे गोलंदाजी करणे कठीण होत आहे. मी फिंगर स्पिनर झाल्यासारखे वाटले. पण, मला या परिस्थितींपासून स्वतःला वाचवायचं होतं.’

भारताने 16 चेंडू राखून सामना जिंकला

भारत-आयर्लंडमधील पहिल्या T20 बद्दल बोलायचं झाल्यास पावसामुळे हा सामना 12-12 षटकांचा करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरी टेक्टरने नाबाद 64 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताकडून दीपक हुडा आणि इशान किशन यांनी डावाची सलामी दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 16 चेंडूत 30 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. याच स्कोअरवर 26 धावा करून किशन बाद झाला. मात्र, हुडाने जोरदार फलंदाजी सुरू ठेवली आणि 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Follow Us
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.