IND vs NZ Final : भारताच्या प्लेइंग 11 मधून अखेर या खेळाडूचा पत्ता कट! नेटमध्ये या खेळाडूची झाली चाचणी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल होईल आणि प्लेइंग 11 मध्ये कोण असेल याबाबत कन्फर्म होईल. असं असताना भारतीय संघात एक बदल निश्चित असल्याचं दिसत आहे.

IND vs NZ Final : भारताच्या प्लेइंग 11 मधून अखेर या खेळाडूचा पत्ता कट! नेटमध्ये या खेळाडूची झाली चाचणी
IND vs NZ Final : भारताच्या प्लेइंग 11 मधून अखेर या खेळाडूचा पत्ता कट! नेटमध्ये या खेळाडूची झाली चाचणी
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 08, 2026 | 4:19 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर भारताने एन्ट्री मारली आहे. या स्पर्धेत भारताने सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकमेव सामना गमवला आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची उत्सुकता आहे. कारण इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने 253 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तरीही इंग्लंडने विजयाच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लागला आणि भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. त्यामुळे अंतिम सामन्यात काही बदल दिग्गज क्रिकेटपटूंनी सुचवले होते. त्यापैकी एक बदल आता निश्चित मानला जात आहे. कारण 7 मार्चला भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव केला. यावेळी सराव शिबिरात एक बदल दिसून आला. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये एक बदल निश्चित मानला जात आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्य भारतीय संघाने सराव केला. यावेळी सराव शिबिरात वरूण चक्रवर्ती दिसला नाही. त्याच्याऐवजी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचा सामना रिंकु सिंहने केला. इतकंच काय तर कुलदीप यादवसोबत तिलक वर्मानेही गोलंदाजी केली. हा सराव वरूण चक्रवर्ती ड्रिंक्स काउंटवर बसून पाहात होता. पण त्यापूर्वी वरूण चक्रवर्तीने मोर्ने मॉर्केलच्या मार्गदर्शनाखाली सिंगल स्टंपसमोर गोलंदाजी केली. तसेच त्याच्यासोबत चर्चाही केली. त्यामुळे वरूणच्या कुलदीप प्लेइंग 11 मध्ये दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादवला वरूण चक्रवर्तीच्या फॉर्मबाबत काहीच चिंता नाही. पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की, त्याला माहिती आहे की चांगली कामगिरी कशी करायची ते..वरुण चक्रवर्ती साखळी फेरीत प्रभावी ठरला होता. पण सुपर 8 फेरीत त्याची लय पूर्णपणे बिघडल्याचं दिसून आलं. सुपर 8 फेरीतील 3 सामने आणि उपांत्य फेरीत वरूण चक्रवर्तीने खोऱ्याने धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाचे विजय खूपच कठीण झाले. सुदैवाने जसप्रीत बुमराहने सावरलं. अन्यथा चित्र काही वेगळं असतं.

Follow Us