AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मैंने खुद को उल्लू बनाया…”, सूर्यकुमार यादव याने तिलक वर्मा याला सांगितलं आक्रमक खेळीचं गुपित

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव चमकला. त्याच्या आक्रमक खेळीबाबत तिलक वर्मा याने त्याला प्रश्न विचारला आणि त्याला दिलखुलासपणे उत्तर दिलं.

मैंने खुद को उल्लू बनाया..., सूर्यकुमार यादव याने तिलक वर्मा याला सांगितलं आक्रमक खेळीचं गुपित
सूर्यकुमार यादव याच्या आक्रमक खेळीचं गुपित झालं उघड, तिलक वर्माला उत्तर देताना सूर्यकुमार म्हणाला की...
| Updated on: Aug 09, 2023 | 6:09 PM
Share

मुंबई : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने तिसरा सामना जिंकत कमबॅक केलं आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढचे दोन्ही सामने काहीही करून भारताला जिंकावे लागणार आहेत. तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 44 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यावेळी त्याला मैदानात तिलक वर्मा याची साथ लाभली. तिलक वर्मा यानेही नाबाद 49 धावांची खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याशी तिलक वर्मा याने संवाद साधला. बीसीसीआय टीव्हीवर बोलताना सूर्यकुमार यादव याने दिलखुलासपणे उत्तर दिलं.

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात काय संवाद झाला?

“लोकांना मी एक गोष्ट सांगू इच्छित आहे.सूर्याच्या विशबँडमध्ये होतं की पॉवरप्लेमध्ये थोडा वेळ घेऊन खेळायचं आहे. पण मला हे समजलं नाही की पहिल्या चेंडूपासून सुरु झाला. यामागचं कारण काय?”, असा प्रश्न तिलक वर्मा याने विचारला.

तिलक वर्मा याने सूर्यकुमार यादव विचारलं की, तू जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा नेमका काय विचा करत होता. यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मी इथे विचार करून आलो होतो की आरामात खेळेन. पण पहिल्याच चेंडूवर चौकार आला आणि मी माझं मन बदललं. डोक्यात काही वेगळाच विचार करून आलो होतो, पण मी स्वत:ला उल्लू बनवलं.”

तिलक वर्मा याने पुढे सांगितलं की, “एक बाब अजून विचारायची आहे की स्लो विकेटवर स्क्वेअर लेगच्या वरून पॉवर जनरेट केली. बाकी सर्व शॉट्स मी आयपीएलमध्ये पाहिले आहेत. पण स्क्वेअर लेगवरून स्लो विकेटवर मारणं कसं शक्य झालं, मला कळलं नाही.” यावर सूर्यकुमार उत्तर देताना म्हणाला की, “तुम्हाला हे आरामात सांगतो. तुम्ही सर्वांनी हे बघितलं असेलच. याला ड्रेसिंग रुममध्ये आरामात सांगतो.”

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 मालिकेतील दोन सामने अजून शिल्लक आहेत. या मालिकेतील चौथा साना 12 ऑगस्टला फ्लोरिला खेळला जाणार आहे.

Follow Us
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?