AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs ENGW : इंग्लंड विरुद्धच्या मोठ्या विजयाचा मास्टरमाइंड मैदानाबाहेर बसला होता! हरमनप्रीत कौरने केला खुलासा

वुमन्स टेस्ट क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगला. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. 347 धावांनी इंग्लंडला पराभूत करत ऐतिहासिक नोंद केली आहे. इतक्या मोठ्या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नेमकी रणनिती काय होती? या विजयामागे कोणाचा हात होता? याबाबत खुलासा केला आहे.

INDW vs ENGW : इंग्लंड विरुद्धच्या मोठ्या विजयाचा मास्टरमाइंड मैदानाबाहेर बसला होता! हरमनप्रीत कौरने केला खुलासा
INDW vs ENGW : मी काहीच केलं नाही...! इंग्लंडला पराभूत केल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितली रणनिती
| Updated on: Dec 16, 2023 | 8:54 PM
Share

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. दोन्ही देशात आतापर्यंत झालेल्या 39 कसोटी सामन्यातील हा सहावा विजय आहे. हरमनप्रीत कौर हीने कसोटीत 2014 मध्ये पदार्पण केलं होतं. तसेच तिच्या नेतृत्वात पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला गेला. एकमात्र कसोटी सामन्यात भारताने 347 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे महिला क्रिकेट संघाची सर्वत्र स्तुती होत आहे. यापूर्वी श्रीलंकेने पाकिस्तानला 1998 मध्ये 309 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताने इंग्लंडला 347 धावांनी पराभूत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या विजयानंतर हरमनप्रीत कौर हीने या सामन्यासाठी कशी रणनिती होती याबाबत खुलासा केला आहे. कसोटीत कर्णधारपदाचा अनुभव हवा तसा नसतानाही मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार याची मदत झाली, असं हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.

विजयाचं श्रेय प्रशिक्षक अमोल मुझूमदार याला देताना हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, “आमच्या प्रशिक्षकांनी आमची खूप मदत केली. माझ्या कसोटी संघाचं नेतृत्व करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. म्हणून मी फक्त त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवत होती. मग पहिल्या डावात शुभा सतीशला एक गडी बाद झाल्यानंतर उरवण्याचा निर्णय असो की गोलंदाजीतील रणनिती..”

“आज खेळ सुरु झाला तेव्हा सुरुवातीची 40 मिनिटं खूप महत्त्वाची होती. आम्हाला इंग्लंड दबाव कायम ठेवायचा होता. आम्ही सकाळच्या परिस्थितीचा लाभ उचलण्याची रणनिती आखली होती. यासाठी प्रशिक्षकाच्या अनुभवाचा फायदा झाला. यामुळे आम्हाला हा विचार करण्यास मदत मिळाली संघासाठी सर्वश्रेष्ठ काय असेल.”, असंही हरमनप्रीत कौर हीने पुढे सांगितलं.

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सर्वबाद 428 धावा केल्या. तसेच या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 136 धावाच करू शकला. भारताकडे 292 धावांची आघाडी होती. त्यानंतर त्यात टीम इंडियाने 6 गडी गमवून आणखन 186 धावांची भर घातली आणि डाव घोषित केला. भारताने इंग्लंडसमोर 478 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडचा संघ फक्त 131 धावा करू शकला आणि भारताने 347 धावांनी विजय मिळवला.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.