AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: मोहम्मद सिराज 23 विकेट्स घेण्यासाठी इतका किमी धावला? वाचून तुम्हाला बसेल धक्का

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपली असली तरी बातम्या काही संपत नाही. पाचव्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली आणि विजय मिळवून दिला. या मालिकेत त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. पण यासाठी किमी धावला माहिती आहे का?

IND vs ENG: मोहम्मद सिराज 23 विकेट्स घेण्यासाठी इतका किमी धावला? वाचून तुम्हाला बसेल धक्का
IND vs ENG: मोहम्मद सिराज 23 विकेट्स घेण्यासाठी इतका किमी धावला? वाचून तुम्हाला बसेल धक्काImage Credit source: Ben Hoskins/Getty Images for Surrey CCC
| Updated on: Aug 08, 2025 | 7:31 PM
Share

टीम इंडियाने पाच सामन्यांची कसोटी मालिका यशस्वीरित्या 2-2 ने बरोबरीत सोडवली. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. एकंदरीत संपूर्ण संघाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. बुमराहच्या गैरहजेरीत भारताने पाचवा कसोटी सामना जिंकला. या कसोटी सामन्यात भारतावर दडपण होतं. पण भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ही भूमिका चोखपणे पार पाडली. मालिकेतील पाचही सामन्यात मोहम्मद सिराज खेळला. वर्कलोड मॅनेजमेंटचा काही प्रश्नच नव्हता. सर्व सामने खेळणाऱ्या टीम इंडियाच्या काही मोजक्या खेळाडूंपैकी सिराज हा एक आहे. वेगवान गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असलेल्या इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर सिराजने भेदक गोलंदाजी केली. संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा गोलंदाजी केली. सिराजने खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये एकूण 185.3 षटके टाकली. म्हणजेच 1113 चेंडू टाकले. पण यासाठी सिराज किती किमी धावला? माहिती आहे का? यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 185.3 षटके टाकली. याचा अर्थ असा की सिराजने 25 दिवसांत 1113 चेंडू टाकले. सिराजने इतके चेंडू टाकण्यासाठी 31 किमीपेक्षा जास्त धाव घेतली. आता जर आपण सिराजचा गोलंदाजीची रनअप 14 मीटर पकडली तर तर सिराजने प्रत्येक चेंडूसाठी 28 मीटर अंतर कापले. म्हणजेच तितकं लांब जाऊन गोलंदाजी करणे. आता जर सिराजने प्रत्येक चेंडूसाठी 28 मीटर धावला असेल तर 1113 चेंडू टाकण्यासाठी 31 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले.

मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. पण यासाठी त्याने 31 किमीपेक्षा जास्त अंतर कापलं. हे तर फक्त गोलंदाजीचं झालं. या दरम्यान, सिराजने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही केलं. त्यामुळे त्याने या मालिकेत चांगलाच घाम गाळला हे स्पष्ट दिसत आहे. मोहम्मद सिराजची निवड आशिया कप 2025 स्पर्धेत होईल की नाही अजूनही गुलदस्त्यात आहे. पण त्यानंतर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेत नक्कीच असेल.  कारण सध्या कसोटीत त्याच्या गोलंदाजीची धार टीम इंडियाला महत्त्वाची आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत