AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarfaraz khan | ‘मी जावेद मियाँदाद सारख खेळतो असं….’, टीम इंडियात निवड झालेला सरफराज नेमकं काय म्हणाला?

Sarfaraz khan | देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करुनही सर्फराज खानसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जात नव्हते. अखेर त्याला संधी मिळालीय. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याची टीम इंडियात निवड झालीय. सलग दोन रणजी ट्रॉफी स्पर्धांमध्ये 900 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

Sarfaraz khan | 'मी जावेद मियाँदाद सारख खेळतो असं....', टीम इंडियात निवड झालेला सरफराज नेमकं काय म्हणाला?
sarfaraz khan
| Updated on: Feb 02, 2024 | 12:09 PM
Share

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा फलंदाज सरफराज खानसाठी अखेर भारतीय क्रिकेटचे दरवाजे उघडले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याची टीम इंडियात निवड झालीय. विशाखापट्टनम टेस्टसाठी सरफराजची टीममध्ये निवड होईल, असं बोलल जात होतं. पण त्याच्याऐवजी रजत पाटीदारच प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सरफराजने खोऱ्याने धावा केल्या आहेत. सलग दोन रणजी ट्रॉफी स्पर्धांमध्ये 900 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 25 सामन्यात त्याची सरासरी 82.83 आहे. सरफराज खान प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला, तरी तो ड्रेसिंग रुममध्ये असेल. तो अनुभव सुद्धा भविष्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतक्या धावा करुनही त्याला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? असा प्रश्न अनेकदा उपस्थित झालाय. त्याची निवड न करण्यावरुनही वाद झालेत.

सरफराज खानच्या बाबतीत त्याच्या फिटनेसचा मुद्दा निवड समितीच्या काही सदस्यांनी उपस्थित केला होता. सरफराजला कष्ट चुकलेले नाहीत. त्याला काहीही सहजतेने मिळालेलं नाही. फिटनेसचा मुद्दा असूनही त्याने अनेक शतकी खेळी साकारल्या आहेत. आता त्याची कामगिरी ध्यानात अखेर सरफराजला संधी मिळाली आहे.

सरफराज काय म्हणाला?

“मला विराट कोहली, एबी डी विलियर्स, सर विवियन रिचर्ड्स आणि जावेद मियाँदाद यांची बॅटिंग बघायला आवडते. मी जावेद मियाँदाद सारखा खेळतो अस मला माझे वडिल म्हणतात. मी जो रुटची बॅटिंग सुद्धा आवडीने बघतो. जो कोणी यशस्वी ठरतोय, त्याचा खेळ मी पाहतो. ते पाहून माझ्या खेळात मी तशी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. रणजी ट्रॉफी असो किंवा भविष्यात भारताकडून खेळण मी हे सुरुच ठेवणार” असं सरफराज जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला.

‘पण माझ्या वडिलांचा मेहनतीवर विश्वास होता’

“माझ्या वडिलांनी माझी क्रिकेटशी ओळख करुन दिली. मी अजून क्रिकेट कसा खेळतोय हा मला प्रश्न पडतो. मी आक्रमक फलंदाज आहे. मी इतरांपेक्षा लवकर आऊट व्हायचो. मोठी धावसंख्या उभारण कठीण होतं. मी बाद झाल्यानंतर दुसऱ्यांना मोठी खेळी करताना पाहून मी निराश व्हायचो. पण माझ्या वडिलांचा मेहनतीवर विश्वास होता. आज माझ्याकडे जे काही आहे, ते त्या मेहनतीमुळे” अस सरफराजने सांगितलं.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.