AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Captaincy | लाजिरवाण्या पराभवामुळे मनाला ठेच, स्टार खेळाडूचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय

दुसऱ्या सामन्यात टीमला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले. तसेच टीममधील खेळाडूंचा आत्मविश्वासही कमी झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्णधाराने कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Captaincy | लाजिरवाण्या पराभवामुळे मनाला ठेच, स्टार खेळाडूचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय
| Updated on: Mar 20, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर 17 मार्चपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 3 क्रिकेट मॅचच्या वनडे सीरिजला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दुसरा सामना हा 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून 188 धावांवर ऑलआऊट केलं होतं. ऑस्ट्रेलियाने त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट करत परतफेड केली. यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच 118 धावांचं आव्हान पूर्ण केलं. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह या वनडे सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाने भारतात टीम इंडियावर 234 चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने अवघ्या 11 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. अशा प्रकारे कोणत्याही संघाने टीम इंडियावर भारतात चेंडूच्या फरकाने जिंकलेला हा मोठा विजय ठरला. या मालिकेतील निर्णायक तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.

दुसऱ्या सामन्यात झालेल्या निराशाजनक पराभवामुळे कॅप्टनने आता कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:कॅप्टनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेला पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 58 धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेला व्हाईट वॉश केला. न्यूझीलंडने ही मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली. याआधी थरारक झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला.

आता या कसोटी मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. दिमुथने याबाबत ट्विट केलं आहे. दिमुथने आयर्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कर्णधारपद सोडणआर असल्याचं म्हटलं आहे.

दिमुथने आपल्या जागी कर्णधार शोधावा, असं टीम मॅनेजमेंटला सांगितंल आहे. मात्र दिमुथच्या या निर्णयाबाबत टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा भूमिका मांडण्यात आलेली नाही. यामुळे टीम मॅनेजमेंट आता काय निर्णय घेतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार